Shivaji University researchers developed an automated gas adsorption measurement device and secured a Government of India design patent for pollution monitoring.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या ‘ऑटोमेटेड गॅस ॲडसॉर्प्शन मेजरमेंट डिव्हाइस’ (Automated Gas Adsorption Measurement Device) या नाविन्यपूर्ण उपकरणाच्या डिझाइनला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. या उपकरणाच्या डिझाइन पेटंटचे नोंदणी प्रमाणपत्र संशोधकांना प्रदान करण्यात आले असून, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. कल्याण गरडकर आणि जयसिंगपूर महाविद्यालयाचे डॉ. संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता पाटील, डॉ. रोहंत ढब्बे, किशोर जाधव, कबीर कुंभार आणि डॉ. अमृता कोळी यांनी हे संशोधन केले. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचे डॉ. विक्रम देसाई यांचेही या संशोधनासाठी सहकार्य लाभले.
डॉ. गरडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (CO₂) उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका गंभीर बनला आहे. यामुळे ध्रुवावरील बर्फ वितळणे, महासागरांचे आम्लीकरण आणि पर्यावरणीय असंतुलन वाढत आहे. तसेच अमोनिया वायू वातावरणातील आर्द्रतेशी अभिक्रिया करून अल्कधर्मी द्रावण तयार करतो, ज्यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर कार्बन डायऑक्साईड, अमोनिया आणि मिथेनसारख्या घातक वायूंचे अचूक मापन व विश्लेषण करण्यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. विशिष्ट दाब आणि तापमानाच्या स्थितीत एखादा पदार्थ किती प्रमाणात वायू शोषून घेतो, याचे विश्लेषण हे उपकरण करते. पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीवर आधारित असल्यामुळे मानवी चुकांची शक्यता कमी होते आणि मापनाची नोंद डिजिटल स्वरूपात करता येते.
या उपकरणात ‘मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर’ आधारित गॅस सेन्सर्सचा वापर करण्यात आला असून, ते विविध वायूंची उपस्थिती अचूकपणे मोजू शकते. वायू प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक वायूंची तपासणी आणि पर्यावरणीय निरीक्षणासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या महागड्या यंत्रणांना पर्याय म्हणून स्वस्त, पोर्टेबल आणि स्वयंचलित उपकरण विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी संशोधन चमूचे अभिनंदन केले आहे.
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…