On National Science Day 2026, Shivaji University organized a ‘Sugamyavijnan’ initiative enabling visually impaired students to explore plant life through touch, smell, taste, and experiential learning.
शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘सुगम्यविज्ञान’ उपक्रम
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘बीजारोपण ते उत्पादन’ या विषयावर विशेष ‘सुगम्यविज्ञान’ हा उपक्रम आयोजित केला. याअंतर्गत स्पर्श, गंध, आकार आणि चवीच्या माध्यमातून विविध वनस्पती ओळखण्याचे तंत्र या विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले. वनस्पतीजगताची अनोखी ओळख आणि अनुभव या विद्यार्थ्यांना घेता आला.
राष्ट्रीय विज्ञान दिन – २०२६ अंतर्गत शिवाजी विद्यापीठात युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्यावतीने दृष्टि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित विज्ञान उपक्रम राबविण्यात आला. बीजरोपणापासून उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करत वनस्पतींची वाढ, बियांची रचना, अंकुरण प्रक्रिया, रोपांची निगा आणि शेतीतील उत्पादन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध फळे, मसाले, औषधी व सुगंधी वनस्पतींचे स्पर्श, गंध तसेच चव यांच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली.
या उपक्रमात सुशिलाबाई घोडावत अंध विद्यालय (सांगली-मिरज), ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध विद्यालय (कोल्हापूर) आणि श्री सद्गुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय (पलूस) येथील सुमारे शंभर दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक आणि पालकही उपस्थित होते. स्पर्श, सुगंध, चव आणि आकार यांच्या आधारे वनस्पती ओळखण्याचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर, संयोजक डॉ. एस. आर. यंन्कंची, युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा जाधव आणि डॉ. एस. ए. पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…