मुक्त संवाद

कष्टकरी कामगार चळवळीची शिवाजीराव कदम यांना श्रद्धांजली

कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे गुरुवारी ( ता. १८ सप्टेंबर ) निधन झाले. शिवाजीराव कदम हे मुळचे कदमवाडी भोसलेवाडी येथील शेतकरी. बालपणापासूनच त्यांचा निसर्ग, शेती आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचं लग्न शेतकरी कामगार पक्षाचे नेते केशवराव जगदाळे ह्यांचा मुलीशी झालं होत.

शिवाजीराव शेतकरी कामगार पक्षाचे जुने कार्यकर्ते. १९६७ साली कोल्हापूर नगर परिषद येथे निवडून आले. त्या निवडणुकीत शेकाप व समाजवादी पक्षाची युती होती. ते आमचे पुरस्कृत उमेदवार होते. रवींद्र सबनीस समाजवादी पक्षाचे नेते होते. ते आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. त्या काळात शेतकरी कामगार पक्षाचा कोल्हापुरात मोठा दबदबा होता. शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर शहरातही कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क होते.

नगर परिषदेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ७ नगरसेवक निवडून आले होते, त्यामध्ये प्रमुख उर्मिलाकाकी सबनीस व अॅड. अविनाश अडके व शिवाजीराव कदम यांचा समावेश होता. नगरपरिषद व महापालिकेत ते निवडून येत होते. ते डाव्या विचारसरणीचे असल्याने व या विचाराचे ते काम करत असल्याने त्यांचा आणि माझा त्या निवडणुकीपासूनच जवळचे संबंध प्रस्तापित झाले.

महापालिकेत मी नोकरी करत असल्यामुळे मी निवडणुक लढविण्याचा विचार केला नाही. पण अलीकडेच ते आणि मी कोल्हापूर शेतकरी संघाची निवडणूक एकत्र लढलो. त्यात आमचे पॅनल निवडून आले. संघातील अनेक नियम बाह्यकृतींना आमचा कडाडून विरोध होता. राजश्री शाहू कॉलेज, तसेच कोल्हापूर बाल कल्याण संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम केले. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी समाजकारण राजकारण केले. डाव्या चळवळीतील नेता आपल्यातून निघून गेला. त्यांची उणीव सगळ्यांना जाणवणार. त्यांना झोपडपट्टीवासिय, कष्टकरी कामगार व शेतमजूर चळवळीच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.

– साथी व्यंकाप्पा भोसले, दलितमित्र, कोल्हापूर.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

7 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

20 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago