May 28, 2026
Home » कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप भुईमूग व सोयाबीन बियाणे वाटप
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप भुईमूग व सोयाबीन बियाणे वाटप

Kolhapur farmers to get free groundnut and soybean seeds under NMEO-OS 2026-27 scheme with subsidy benefits for oil extraction units and storage facilities.

कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तेलबिया पिकांच्या शाश्वत वाढीसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) सन २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप भुईमूग व सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने भुईमूग आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांची अभियानासाठी निवड करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचे १०० टक्के मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच काढणीपश्चात पायाभूत सुविधांसाठीही विविध अनुदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तेल काढणी युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९.९० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

सुरक्षित साठवणुकीसाठी २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी ५० टक्के किंवा कमाल १४.४० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मिनी ऑईल मिल किंवा एक्सपेलर युनिटसाठी फिल्टर प्रेससह कमाल ४ लाख रुपये, तर फिल्टर प्रेसशिवाय युनिटसाठी कमाल ३ लाख रुपयांपर्यंत (किंमतीच्या ४० ते ५० टक्के) अनुदान मिळणार आहे.

सन २०२६-२७ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आल्याने महिला शेतकऱ्यांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या MahaDBT पोर्टल वर त्वरित अर्ज सादर करावेत. या योजनेचा लाभ “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” (FCFS) या तत्त्वावर दिला जाणार आहे. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी ॲग्रीस्टॅक (Agristack) आयडीद्वारे करण्यात येणार आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), FPO, SHG तसेच इतर गटांनीही अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Related posts

हवामान बदल चळवळीविषयी सार्थक संवाद सुरु करण्याचा हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन मधून प्रयत्न

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पाण्यासाठी कोणत्या तरतुदी हव्यात ?

उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकास तुषार सिंचन गरजेचे

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!