काय चाललयं अवतीभवती

डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

शिराळा – तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पणुंब्रे वारुण यांच्या वतीने या राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्काराची घोषणा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील यांनी केली.

उद्योजक बळीराम पाटील चरणकर उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार सुनील यावलीकर अमरावती यांच्या’ काया वाचा मने ‘ या कादंबरीला, शब्दरंग डोंगरी साहित्य पुरस्कार किरण भावसार सिन्नर यांच्या ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहास तर प्रगतशील शेतकरी कै. निवृत्ती डफळे साहित्य पुरस्कार महादेव माने खंडोबाचीवाडी यांच्या ‘ वसप ‘ या कथासंग्रहाला तर सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील पुरस्कार प्रा. भीमराव धुळूबुळू मिरज यांच्या ‘ काळजाचा नितळ तळ ‘ या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे.

तसेच विशेष पुरस्कारामध्ये सुरेश आडके कणेगाव यांच्या ‘सौंदड ‘या कथासंग्रहाची आणि सुभाष कवडे भिलवडी यांच्या ‘प्रकाशपेरणी’ या कविता संग्रहाची निवड झाली आहे.

पुरस्कार स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. पुरस्कार वितरण मार्च २०२५ मध्ये पणुंब्रे वारुण येथे होणाऱ्या १३ व्या डोंगरी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती कवी वसंत पाटील यांनी दिली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष हणमंतराव पाटील, कोषाध्यक्ष सचिन पाटील, सचिव मन्सूर नायकवडी आदी प्रमुख कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

10 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

15 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

23 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago