काय चाललयं अवतीभवती

इशारा : महाराष्ट्र, गोवा पट्ट्यात १६ मे रोजी चक्रीवादळ !

अरबी समुद्रात शुक्रवारी (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तिव्रता वाढून ते चक्रीवादळात रुपांतरीत होईल. या चक्रीवादळाचा प्रभाव रविवारी (ता. १६) महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर याचा प्रभाव जाणवेल.

शुभांगी भुते

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई

या चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच याचा प्रभाव मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाहायला मिळेल. या दिवसात अरबी समुद्राने रुद्र अवतार धारण केल्याचे पाहायला मिळेल असेही शुभांगी भुते यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे रविवारी (ता. 16) महाराष्ट्र व गोवा किनाऱ्यावर 40, 45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत सर्व मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सुचना दिल्या असून, समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधानतेचा इशाराही देण्यात आलेला आहे.

दरम्यान, पूर्वमध्य अरबी समुद्रात शुक्रवारी ( ता. १४) ते रविवार (ता. १६ मे ) रोजी वादळ सदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच सुमारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago