sunetra-joshi-poem-on-sant-tukaram
संत तुकाराम... कनकाई पोटी | माघ पंचमीला || तुकोबा जन्मला | देहू गावी || भार्या आवडाई | बोल्होबा ते तात || चार मुले त्यात | तुकोबांना || रंजले गांजले | आणि मागासले || प्रबोधन केले | समाजाला || नामात विठ्ठल | ध्यानात विठ्ठल || श्वासात विठ्ठल | तुकोबांच्या || रोखठोकपणे | दांभिकपणाला || केले समाजाला | निरुत्तर || गोविंद गोविंद | लागलासे छंद || नाही भेदाभेद | दोघांच्यात || सदेह वैकुंठी | विठ्ठल सदनी || पुष्पक विमान | बैसोनिया || तुकाराम बीज |त्यांची पुण्यतिथी || द्वितीया ही तिथी | फाल्गुनाची || जगद्गुरू त्यांना | उपाधि मिळाली || समाजाने दिली | सन्मानाने || तुकारामगाथा | ज्ञानभक्तीपर || तरे पाण्यावर | चमत्कार. || विठ्ठल चरणी | सुनेत्रा ही लीन || करते वंदन | तुकारामा || सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…