ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये बेहडा या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पतीआरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- बेहडा

          ही वनस्पती कॅंम्बेटसी कुळातील असून ती प्रामुख्याने कोकणात आढळते. हा उंच पानझडी वृक्ष आहे. सालीला निळसर छटा असून उभट चिरा असतात. खोड १० ते १५ मीटर सरळ वाढते. पाने हिरवीगार आणि अर्धवर्तुळाकार असतात. फुले हिरवट आणि उग्र वासाची असतात.

औषधी उपयोग-

          रक्ताची कमतरता आणि ल्युकोडर्मा यासाठी सालीचा उपयोग होतो. फळे चवीला तुरट असून पाचक, सारक, कृमिनाशक असून घशाची जळजळ ब्रोकायटीस, दमा, नेत्रविकार, हृदय, नाक, मूत्राशय आदीवर होणाऱ्या विकारावर गुणकारी आहे. बेहड्याचे फळ त्रिफळा चुर्नातील एक घटक आहे. बियाचे तेल केशवर्धक असून संधिवातावर गुणकारी आहे. फळाचा वापर इतर औषधाबरोबर सर्पदंश व विंचू दंशावर केला जातो. याचा उपयोग सर्दी, तहान, दात, कफ आदी विकारांवर केला जातो.

हवामान व जमीन-

          हा वृक्ष भारत, म्यानमार, श्रीलंका या देशामध्ये आढळतो. जंगल हवामानातील समुद्र सपाटीपासून १००० मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष आढळतो. महाराष्ट्रातील विशेषतः कोकणामध्ये हा वृक्ष आढळतो. डोंगर उतारावर आणि नदी नाल्याच्या न्क्देला याची वाढ चांगली होते.

लागवड –

          या झाडाची लागवड बी पेरून/ नर्सरीमध्ये रोप तयार करून करावी. बिया २४ तास पाण्यात ठेवून त्यानंतर त्याचा पेरणीसाठी वापर करावा.

मशागत-

          गवत काढणे, वेळोवेळी पुरेसे पाणी देणे, पहिले ४/५ वर्षे सोय/ चवली असे आंतरपीक घ्यावे. म्हणजे मशागतीचा खर्च मिळू शकतो.

काढणी-

          लागवडीनंतर ७/८ वर्षांनी फळे लागण्यास सुरुवात होते. झाडाचे आयुष्य ३०/४५ वर्षे असते. चांगली वाढलेली निरोगी फळे गोळा करून सुकवावीत. फळांच्या बियांवरील मांसल भाग औषधी असल्याने त्याची भुकटी करावी.

उत्पादन/बाजारभाव-

          एका झाडापासून ४० ते ५० किलो फळे मिळतात. एक किंवा दोन रुपये किलो भाव असला तरी मागणी मोठी आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 hour ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago