शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रशांत महासागरात अपेक्षित  ‘ ला- निना ‘चे अस्तित्व पण…

‘ दिवसाचा थंडावा व रात्रीचा ऊबदारपणा कायम ठेवून, थंडी अशीच कमी जाणवणार!

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात सकाळची आर्द्रता ७० ते ८० % म्हणजे सरासरी इतकी जाणवत आहे. त्यामुळे वातावरण अति ढगाळ नसले तरी निरभ्रते ऐवजी आकाशात काहीसे मळभाची चादर सध्या जाणवत आहे.

दुपारी ३ चे कमाल तापमान हे ३३ डिग्री से. ग्रेड म्हणजे सरासरीच्या जवळपास दोन पासून ते चार डिग्रीपर्यन्त वाढलेले जाणवत आहे. तर पहाटेचे किमान तापमान २० ते २२ डिग्री से. ग्रेड म्हणजे दोन ते तीन डिग्रीपर्यन्त वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा व रात्री थंडीऐवजी तेथे ऊबदारपणाच जाणवत आहे.

उर्वरित खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण २९ जिल्ह्यात मात्र कमाल तापमान सरासरीच्या खाली तर पहाटेचे किमान तापमानातील वाढ ही सरासरीपेक्षा अत्याधिक आहे. त्यामुळे शनिवार दि.११ जानेवारीपासून  संपूर्ण महाराष्ट्रात दिवसा गारवा जाणवत आहे तर रात्री थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.

थंडीचा हा प्रभाव, ओरिसा दरम्यान असलेल्या प्रत्यावर्ती म्हणजे घड्याळ काटा दिशेप्रमाणे वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्यामुळे,  बं.उपसागराततून  महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे  पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारी पर्यंत असाच कमी जाणवणार आहे, असे वाटते.

आठवड्यानंतर मात्र, त्यापुढील तीन दिवस म्हणजे, सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल, असे वाटते. थोडक्यात जानेवारी महिन्याच्या उर्वरित दिवसात थंडीचा चढ-उतार असाच जाणवेल, असे वाटते.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही. प्रशांत महासागरात अपेक्षित  ‘ ला- निना ‘चे अस्तित्व आढळू लागले आहे.  सध्याचे त्याचे हे अस्तित्व  कमकुवत स्वरूपाचेच अल्प कालावधीचे असल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर विशेष जाणवणार नाही,असे वाटते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

23 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

1 day ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

4 days ago