काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर

  • तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार आणि तिळगंगा प्रतिभा पुरस्कार जाहीर
  • वृषाली खैरनार, बाबा जाधव, अशोक भेलके व ऍड.शुभदा कुलकर्णी याना पुरस्कार.

पाचवे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन, पेठ पंचक्रोशी, पेठच्या वतीने २२ जानेवारी 2023 रोजी होत आहे. यानिमित्ताने यंदाच्या वर्षांपासून कथासंग्रह , कवितासंग्रहकादंबरी या साहित्यप्रकारातील पहिल्या साहित्यकृतीला कवी -गझलकार विनायक कुलकर्णी पुरस्कृत स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी (तात्या ) जवळेकर स्मृती तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात देण्याचा निर्णय घेण्यात असून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सन २०२२ साठी अनुक्रमे कवी बाबा जाधव ( रुई, जि. कोल्हापूर) यांना ‘ भूक ‘ ,या कवितासंग्रहासाठी , तसेच कादंबरीकार अशोक भेलके ( पुणे ) यांना ‘ पुण्य तोयम् ‘ या कादंबरीसाठी तर कथालेखिका वृषाली नरेंद्र खैरनार (साक्री जि. धुळे) यांना ‘ दुष्टचक्र ‘ या कथासंग्रहासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच ललित लेखसंग्रहप्रवासवर्णन या साहित्य प्रकारासाठी प्रदान करण्यात येणारा प्रतिभा बुक्स, इस्लामपूर पुरस्कृत स्व. बाळासाहेब पाटील स्मृती तिळगंगा प्रतिभा पुरस्कार हा ऍड. सौ. शुभदा कुलकर्णी ( वडूज जि. सातारा )यांना ‘असोशीची भाषांतरे ‘ या ललित लेख संग्रहासाठी जाहीर करण्यात आलेला आहे.

२२ जानेवारी २०२३ रोजी पेठ जि. सांगली येथे होणाऱ्या पाचव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ साहित्यिक मेहबूब जमादार, अध्यक्ष, तिळगंगा साहित्यरंग परिवार तसेच संगीत अलंकार पंडित लोहार, संगीतरत्न कै. ग. रा.पाटील संगीतमंच आणि ज्येष्ठ समाजसेवक सर्जेराव जाधव, अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ ,पेठ यांनी संयुक्तरित्या दिली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 hour ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

11 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

12 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago