May 2, 2026
Tilganga Sahitya Prerana awards Peth Sangli
Home » तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर

  • तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार आणि तिळगंगा प्रतिभा पुरस्कार जाहीर
  • वृषाली खैरनार, बाबा जाधव, अशोक भेलके व ऍड.शुभदा कुलकर्णी याना पुरस्कार.

पाचवे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन, पेठ पंचक्रोशी, पेठच्या वतीने २२ जानेवारी 2023 रोजी होत आहे. यानिमित्ताने यंदाच्या वर्षांपासून कथासंग्रह , कवितासंग्रहकादंबरी या साहित्यप्रकारातील पहिल्या साहित्यकृतीला कवी -गझलकार विनायक कुलकर्णी पुरस्कृत स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी (तात्या ) जवळेकर स्मृती तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात देण्याचा निर्णय घेण्यात असून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सन २०२२ साठी अनुक्रमे कवी बाबा जाधव ( रुई, जि. कोल्हापूर) यांना ‘ भूक ‘ ,या कवितासंग्रहासाठी , तसेच कादंबरीकार अशोक भेलके ( पुणे ) यांना ‘ पुण्य तोयम् ‘ या कादंबरीसाठी तर कथालेखिका वृषाली नरेंद्र खैरनार (साक्री जि. धुळे) यांना ‘ दुष्टचक्र ‘ या कथासंग्रहासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच ललित लेखसंग्रहप्रवासवर्णन या साहित्य प्रकारासाठी प्रदान करण्यात येणारा प्रतिभा बुक्स, इस्लामपूर पुरस्कृत स्व. बाळासाहेब पाटील स्मृती तिळगंगा प्रतिभा पुरस्कार हा ऍड. सौ. शुभदा कुलकर्णी ( वडूज जि. सातारा )यांना ‘असोशीची भाषांतरे ‘ या ललित लेख संग्रहासाठी जाहीर करण्यात आलेला आहे.

२२ जानेवारी २०२३ रोजी पेठ जि. सांगली येथे होणाऱ्या पाचव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ साहित्यिक मेहबूब जमादार, अध्यक्ष, तिळगंगा साहित्यरंग परिवार तसेच संगीत अलंकार पंडित लोहार, संगीतरत्न कै. ग. रा.पाटील संगीतमंच आणि ज्येष्ठ समाजसेवक सर्जेराव जाधव, अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ ,पेठ यांनी संयुक्तरित्या दिली आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

कराडच्या शब्दशिल्प वाड्.मय पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

पश्चिम घाटातील 30,000 हून अधिक जीवजंतूंचे भारतीय प्राणी सर्वेक्षणमार्फत दस्तऐवजीकरण

जे बोलायला पाहिजेत ते बोलतच नाहीत – नाटककार शफाअत खान

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!