काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही हे खरे पण जे सोडणार आहोत त्याची किंमत जे मिळवणार त्या पेक्षा जास्त नाही ना एवढे तरी विचारात घ्यायला हवेच..मधेच कधी क्षणभर थांबून मागे वळून पण बघायला हवे. खूप पुढे गेल्यावर मग काहीच हातात रहात नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असतेच.

सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

किंमत म्हटले की सहज आठवते आपण कुठेही दुकानात जातो. एखादी वस्तू बघतो. आवडली की किंमत विचारतो. ती पटली आणि खिशाला परवडणारी असेल तर खरेदी करतो. कधी किंमत नाही पटली तर म्हणतो छे.. एवढे पैसे देऊन घेण्यासारखे नाही… आणि सोडून देतो. माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत करण्याची वाईट सवय असते.

आणि हीच किंमत माणूस मग माणसांची नात्याची सुध्दा करू पाहतो. जो माणूस आपल्या कामाचा असेल.. ज्याची आपल्याला गरज असेल किंबहुना ज्याच्या मुळे आपला काही फायदा होणार असेल अशा माणसाची त्याला किंमत असते. त्याला तो सांभाळून घेतो. आणि ज्याची गरज नाही त्याची किंमत वेगळ्या अर्थाने करून त्याला टाकून देतो..

पण ही किंमत कधी कधी महागात सुध्दा पडते. कारण वेळ गेल्यावर कशाची किंमत कळून काही फायदा नसतो. जसे की लहानपणी आपल्याला लवकर मोठे व्हायचे असते पण जेव्हा मोठे होतो जगात टक्के टोणपे खातो तेव्हा बालवयातील मजेची किंमत कळते. आणि मग लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा… म्हणत हळहळतो. आणि मग त्याची किंमत कळते.

तरुणपणी खूप पैसा मिळविण्यासाठी मरमर काम करतो. तेव्हा माणसांची तसेच नात्यांची किंमत नसते असे नाही पण जाणवत नाही. आज तर सर्रास पैसा फेकला की हवे ते मिळते अशी भावना सगळीकडे बघायला मिळते. अगदी आईवडीलांची सुध्दा किंमत ते पैशाने करू पाहतात. पण मग हळूहळू जसजसे वय वाढत जाते तेव्हा लक्षात येते की आपण त्या सगळ्याची किती मोठी किंमत चुकवली आहे. कधी कधी एखादे वाईट काम कुणी करत असते. क्षणभराचा आनंद त्यात मिळत असेलही पण त्यासाठी पुढे त्याची जबर किंमत मोजावी लागते. परतीचा मार्ग उरत नाही. तेव्हा चांगले कर्म करण्याची किंमत ओळखा.

काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही हे खरे पण जे सोडणार आहोत त्याची किंमत जे मिळवणार त्या पेक्षा जास्त नाही ना एवढे तरी विचारात घ्यायला हवेच..मधेच कधी क्षणभर थांबून मागे वळून पण बघायला हवे. खूप पुढे गेल्यावर मग काहीच हातात रहात नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असतेच. काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी सोडावे लागतेच. म्हणजे एका ठीकाणी भर करायची तर दुसरीकडे खड्डा करुनच करता येते. पण आपल्याला कशाची जास्त गरज आहे म्हणण्यापेक्षा कशाने समाधान मिळेल हे सुद्धा कळायला हवे. नाहीतर मग सगळे असून ते नसेल तर पुन्हा हळहळ शिल्लक राहते.

वेळेची किंमत सुध्दा करायलाच हवी. कारण ती एकदा निघून गेली की पुन्हा येत नाही. तसेच आयुष्य हे अनमोल आहे. असे म्हणतात की चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून झाल्यावर जर पदरी काही पुण्य असेल तर मनुष्य जन्म मिळतो. मग छोट्या मोठ्या अडचणींना घाबरून आपण ते संपविणे कितपत योग्य आहे ? त्याची किंमत कमी करू नका. सुखाने जगण्यासाठी प्रयत्न करा. तसेच इतरांना सुखी करण्याचा पण प्रयत्न करा. आयुष्याची किंमत जाणा. आयुष्य असे कवडीमोल करू नका.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

8 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

9 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

22 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago