काय चाललयं अवतीभवती

कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

भास्कर बंगाळे, शशिकांत हिंगोणेकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, छाया कोरेगावकर आदींचा सन्मान

उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२२ चे मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींना देण्यात येणारे पुरस्कार बुधवारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार यांनी जाहीर केले आहेत.

पंढरपूर येथील कथालेखक भास्कर बंगाळे यांच्या “वाटणी “कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर जळगावचे कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत आणि लातूरचे कवी ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या अभंग ज्ञानेश्वर या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आले आहे.

कादंबरी विभागातून मुंबईच्या छाया कोरेगावकर यांच्या रिक्त -विरक्त या कादंबरीस तर चंद्रपूरचे डॉ. प्रा. अनंता सूर यांच्या साहित्य समीक्षा शोध आणि बोध या समीक्षा ग्रंथाला जाहीर झाले आहेत. संभाजीनगर येथील डॉ. रामकिसन दहिफळे यांच्या अहिल्याबाई होळकर या वैचारिक ग्रंथाला ही हा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई येथील सदस्य विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीत रसूल पठाण, प्राचार्य चंद्रशेखर कळसे, प्रा. रामदास केदार, प्रा. चंद्रकांत मोरे यांनी १५७ ग्रंथातून ही निवड केली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार, सचिव देविदास केदार यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. मे २०२३ मध्ये एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

6 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

8 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

17 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago