काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य मंडळाचे शब्दसाधक पुरस्कार जाहीर

चंद्रपूर – झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे झाडी शब्दसाधक पुरस्कार दिले जातात.

यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे साहित्यिकांची निवड केलेली आहे. त्यामध्ये प्रा. नामदेव मोरे (चंद्रपूर), प्रकाश कोडापे (चिमूर), जयंत लेंजे (सिंदेवाही), शितल कर्णेवार (राजुरा), सुनील बावणे (बल्लारपूर), मंगला गोंगले (सावली), वृंदा पगडपल्लीवार (मुल), डॉ.अर्चना जुनघरे (जिवती), सुजित हुलके (पोंभुर्णा), संगीता बांबोळे (गोंडपिपरी), धनंजय पोटे (ब्रह्मपुरी), महादेव हुलके (कोरपना), कु. वंदना बोढे (भद्रावती), विजय भसारकर (वरोरा) यांची शब्द साधक पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर निवड समितीने केलेली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या दहा सप्टेंबरला आनंदवन येथील शांतिनिकेतन निजबल हॉल येथे डॉ. विकास आमटे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सुधाकर कडू, आचार्य ना. गो. थुटे, जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, प्राचार्य रत्नमाला भोयर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या झाडी शब्दसाधक पुरस्कार सोहळ्याकरिता जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा शाखेचे तालुकाध्यक्ष कवी पंडित लोंढे यांनी केले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago