मनोरंजन

70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 जाहीर : सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ‘वाळवी’

मुंबई2022 सालचे 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. फीचर फिल्म्स, नॉन-फिचर फिल्म्स आणि सिनेमावरील लिखाण यासह विविध श्रेणींमधील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारे हे पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचे पुरस्कार समजले जातात.

70 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील मराठी चित्रपट विषयक ठळक मुद्दे :

मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये लक्षणीय ठसा उमटवला. अनेक चित्रपट विविध श्रेणींमध्ये प्रशंसेसाठी पात्र ठरले. उल्लेखनीय कामगिरी करणारे विजेते पुढील प्रमाणे :

फीचर फिल्म:

  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: वाळवी

परेश मोकाशी दिग्दर्शित, मयसभा करमणूक मंडळी आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड निर्मित, वाळवी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. या चित्रपटाला रजत कमळ आणि 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.   

नॉन-फिचर फिल्म

  • सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक / ऐतिहासिक मांडणी / संकलन चित्रपट : आणखी एक मोहेंजोदडो

द गोवन स्टुडिओ आणि अशोक राणे प्रॉडक्शन निर्मित, अशोक राणे दिग्दर्शित चित्रपट, ‘आणखी एक मोहेंजोदडो’. ऐतिहासिक संकल्पनांचा धांडोळा घेणाऱ्या या चित्रपटाला रजत कमल आणि रु. 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे

  • सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट: वारसा

सचिन बाळासाहेब सुर्यवंशी निर्मित आणि दिग्दर्शित वारसा या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार आणि रु. 2,00,000/- चा पुरस्कार विभागून देण्यात येईल. हा पुरस्कार कन्नड चित्रपट, ‘रंग विभोगा’ (मंदिर नृत्य परंपरा, निर्माता आणि दिग्दर्शक: सुनील नरसिंहचर पुराणिक) या चित्रपटाबरोबर विभागण्यात आला आहे.   

  • सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्तम निवेदन: मर्मर्स ऑफ द जंगल (MURMURS OF THE JUNGLE)

सोहिल वैद्य दिग्दर्शित, या माहितीपटाला रजत कमल आणि रु. 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटासाठी निवेदन करणारे सुमंत शिंदे यांनाही सर्वोत्कृष्ट निवेदन/व्हॉईस ओव्हरसाठी रजत कमल आणि रु. 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

2 hours ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

12 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

1 day ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

2 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

3 days ago