कविता

राक्षस जन्मास आले….

भीती

लोटला किती काळ
देश स्वतंत्र होऊनी
परी भीती येथली
नाही संपली अजुनी…

अबलांना तुडवीले जातेय
भोगदासी समजूनी
किती विटंबना देहाची
तुकडे,तुकडे करुनी….

सोसतेय घाव अजुनही
नारी स्वातंत्र्यात
नाही तिला संरक्षण
जगतेय ती पारतंत्र्यात…

वाली तिजला हवाय
कृष्ण सखा वस्त्र पुरवणारा
अवतरु दे भुतलावर
षंढांना अद्दल घडवणारा….

आंदोलन, भाषणे कुचकामी
तेवढ्यापुरतेच पेटून उठणारे
अशी शिक्षा व्हावी नराधमांना
फोडावे डोळे, वासनांध बघणारे….

चिमुकल्यांचे हसते खेळते
जग क्षणात उद्ध्वस्त झाले
विकृती कसली माणसात
राक्षस जन्मास आले….

सौ सीमा मंगरूळे तवटे वडूज

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

11 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

12 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

22 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago