काय चाललयं अवतीभवती

अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर 30 रोजी परिसंवाद

समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन

पुणेस्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या ‘निखळत्या चौकटीत’ या अंजली ढमाळ लिखित कादंबरीवर ३० मे २०२६ रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या कादंबरीवर समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे शनिवारी ( ता. ३० ) सकाळी साडे दहा वाजता पुणे येथील नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन येथे हा विशेष परिसंवाद होणार आहे.

समीक्षक रेखा इनामदार साने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात वक्ते म्हणून समीक्षक रणधीर शिंदे, स्त्री साहित्याच्या अभ्यासक गीताली वि. म. आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत सहभागी होणार आहेत, अशी माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अजय कांडर आणि मधुकर मातोंडकर यांनी दिली.

लेखिका अंजली ढमाळ लिखित आणि रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेली ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. परंपरेच्या, नात्यांच्या आणि सामाजिक बंधनांच्या चौकटीत अडकलेल्या स्त्री-मनाचा वेध घेणारी ही कादंबरी असून कादंबरीतील आशय, भाषा, निवेदनशैली आणि स्त्री-प्रश्नांची मांडणी या सर्व अंगांवर परिसंवादात चर्चा करताना तसेच कादंबरीचे विविध पैलू उलगडताना वक्ते सामाजिक संदर्भ, स्त्रीवादी दृष्टिकोन आणि साहित्यिक मूल्यमापन यावर प्रकाश टाकणार आहेत.

कोकणातील कवी-लेखकांबरोबर महाराष्ट्रातील इतर भागातील साहित्यिकांनाही मंच उपलब्ध व्हावा, उत्तम गुणवत्ता असणाऱ्या लेखक कवींना प्रोत्साहन मिळावे आणि समाज वास्तव मांडणाऱ्या साहित्याला बळ मिळावे, या हेतूने समाज साहित्य प्रतिष्ठान कार्यरत आहे. ‘निखळत्या चौकटीत’वरील हा परिसंवाद केवळ एका कादंबरीची चर्चा नसून वाचन संस्कृती वाढावी, साहित्यावर संवाद घडावा आणि लेखक-वाचक यांच्यातील दुवा घट्ट व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे समाज साहित्य प्रतिष्ठानचे अजय कांडर, मधुकर मातोंडकर यांनी स्पष्ट केले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

4 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

16 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago