Chance of cloudy weather in 19 districts for a week
सोमवार ( दि.६ मे ) पासून पुढील आठवडाभर म्हणजे सोमवार ( दि.१३ मे) पर्यन्त संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड अश्या १९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली अश्या १७ जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही.
खान्देशसहित संपूर्ण मध्य-महाराष्ट्र, व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार (दि.७ मे पर्यन्त) रात्रीचा असह्य उकाडा जाणवेल.
महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ व खान्देश तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड अश्या २३ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार (दि. ९ मे ) पर्यन्त दुपारचे कमाल तापमान भाग बदलत ४० ते ४२ तसेच ४२ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान राहून ह्या ठिकाणी उष्णतेच्या लाट सदृश्य स्थिती जाणवेल, असे वाटते.
गेल्या संपूर्ण एप्रिल महिन्यात विशेषतः महिन्याच्या उत्तर्धातील शेवटच्या काही दिवसातील माध्यमे व इतरांद्वारे अवकाळीबाबत दिल्या गेलेल्या अंदाजातील कथनी आणि प्रत्यक्षातील निसर्गातील घडणी पाहता ऐन रब्बी पीक काढणीच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे इशारे घाबरवणारेच ठरलेत, असे वाटते. थोडक्यात शेतकऱ्यांनीही आता ह्यापुढे अश्या बातम्यांची नोंद ठेवुन मागोवा घेणे गरजेचे ठरु लागले आहे, असे वाटते. कारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीबाबतची अशीच ओरड ऐकू येईल. ठिक आहे, कि आता, पीक काढणीचा काळ उरकलाय, पण ही घाबरवणी काही थांबत नाही, असेच वाटतेय सध्या काय सांगायचे ते सांगू देत, पण, त्या बातम्या अवश्य अभ्यासाव्यात. असे वाटते.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…