काय चाललयं अवतीभवती

चंद्रपुरच्या शब्दांगण ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर

चंद्रपूर – शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्था, चंद्रपूरच्या वतीने राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य मागविण्यात आले होते. या साहित्यकृतीची परीक्षकांनी निवड करून अंतिम निकाल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी जाहीर केला आहे. पुरस्काराचे हे १५ वे वर्ष आहे.

राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार 2023 चा निकाल

काव्यसंग्रह
१) माही गोधडी छप्पन भोकी – ललित अधाने(औरंगाबाद)
२) सीसीटीव्हींच्या गर्द छायेत – गीतेश शिंदे (ठाणे)
३) कोरड्या घशाचा ताळेबंद – शिवाजी चाळक (चाळकवाडी,जि- पुणे)
४) सिझर न झालेल्या कविता – डॉ. सुनील पवार (मेहकर)
५) स्वेदरंग – बळवंत भोयर (नागपूर)
६) आम्ही युद्धखोर आहोत – प्रशांत वंजारे (आर्णी, जि – यवतमाळ)

समीक्षाग्रंथ
१) तुकोबांच्या अभंगातील बुद्धिप्रामाण्यवाद – डॉ.संतोष देठे (राजुरा, जि – चंद्रपूर)
२) दया पवारांचं बलुतं – डॉ. पवन मांडवकर (यवतमाळ)
३) ग्रामीण साहित्य चळवळ:एक ध्यासपर्व – डॉ.वासुदेव मुलाटे (अहिल्यानगर)
४) सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष – संपा.डॉ.बादलशाहा चव्हाण (बल्लारपूर)
५) संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज – संपा.डॉ.रमेश माने(अमळनेर)
६) मराठी दलित रंगभूमी आणि पारध – डॉ.भास्कर पाटील (अकोला)
७) शरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता: आस्वाद आणि आकलन – प्रा.प्रमोद नारायणे (वर्धा)
८) मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा – डॉ.अलका चिडगोपकर (पुणे)

कथासंग्रह
१) खोडा – उमेश मोहिते (अंबाजोगाई)
२) उसवण – लक्ष्मण दिवटे (बीडसावंगी, जि – बीड)

कादंबरी
१) llज्ञानदीप लावू जगीll – बबन शिंदे (कळमनुरी)
२) चिंध्यांच्या बाहुल्या – श्रद्धा पाटील (अत्याळ, जि-कोल्हापूर)

आत्मकथन
१) वसा केशवाचा (केशव बा. वसेकर,परभणी)
२) आयुष्याचा अभिलेख (ना. गो. थुटे, वरोरा, जि- चंद्रपूर)

नाटक
१) धरतीआबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा – चुडाराम बल्लारपुरे (गडचिरोली)

ललित( संकीर्ण)
१) काळाच्या कॅमेऱ्यातून – राजेंद्र उगले (नाशिक)

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago