Chandrapurs Shabdangan Gyanprabodhini Sansthas literary award announced
चंद्रपूर – शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्था, चंद्रपूरच्या वतीने राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य मागविण्यात आले होते. या साहित्यकृतीची परीक्षकांनी निवड करून अंतिम निकाल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी जाहीर केला आहे. पुरस्काराचे हे १५ वे वर्ष आहे.
राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार 2023 चा निकाल
काव्यसंग्रह
१) माही गोधडी छप्पन भोकी – ललित अधाने(औरंगाबाद)
२) सीसीटीव्हींच्या गर्द छायेत – गीतेश शिंदे (ठाणे)
३) कोरड्या घशाचा ताळेबंद – शिवाजी चाळक (चाळकवाडी,जि- पुणे)
४) सिझर न झालेल्या कविता – डॉ. सुनील पवार (मेहकर)
५) स्वेदरंग – बळवंत भोयर (नागपूर)
६) आम्ही युद्धखोर आहोत – प्रशांत वंजारे (आर्णी, जि – यवतमाळ)
समीक्षाग्रंथ
१) तुकोबांच्या अभंगातील बुद्धिप्रामाण्यवाद – डॉ.संतोष देठे (राजुरा, जि – चंद्रपूर)
२) दया पवारांचं बलुतं – डॉ. पवन मांडवकर (यवतमाळ)
३) ग्रामीण साहित्य चळवळ:एक ध्यासपर्व – डॉ.वासुदेव मुलाटे (अहिल्यानगर)
४) सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष – संपा.डॉ.बादलशाहा चव्हाण (बल्लारपूर)
५) संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज – संपा.डॉ.रमेश माने(अमळनेर)
६) मराठी दलित रंगभूमी आणि पारध – डॉ.भास्कर पाटील (अकोला)
७) शरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता: आस्वाद आणि आकलन – प्रा.प्रमोद नारायणे (वर्धा)
८) मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा – डॉ.अलका चिडगोपकर (पुणे)
कथासंग्रह
१) खोडा – उमेश मोहिते (अंबाजोगाई)
२) उसवण – लक्ष्मण दिवटे (बीडसावंगी, जि – बीड)
कादंबरी
१) llज्ञानदीप लावू जगीll – बबन शिंदे (कळमनुरी)
२) चिंध्यांच्या बाहुल्या – श्रद्धा पाटील (अत्याळ, जि-कोल्हापूर)
आत्मकथन
१) वसा केशवाचा (केशव बा. वसेकर,परभणी)
२) आयुष्याचा अभिलेख (ना. गो. थुटे, वरोरा, जि- चंद्रपूर)
नाटक
१) धरतीआबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा – चुडाराम बल्लारपुरे (गडचिरोली)
ललित( संकीर्ण)
१) काळाच्या कॅमेऱ्यातून – राजेंद्र उगले (नाशिक)
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…