कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधशी काशी देहातील भगवंत राहीला देहातच उपाशी. यासाठी या देहातील भगवंत, देव जाणावा, तो जाणणे. त्याचा अनुभव घेणे. त्याची अनुभुती येणे हेच तर अध्यात्म आहे.

– राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर ।श्रुति जयाचें घर । गिंवसीत आहाती ।। 307 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – देवा, आपण परब्रह्म आहात, आपण ( ओमकाराच्या) साडेतीन मात्रांच्या पलिकडे आहात. आपले ठिकाण वेद शोधीत आहेत.

सोऽहम हा स्वर आहे. स्वराचे अक्षर सोऽहम आहे. हे अक्षरच परब्रह्म आहे. देव आहे. या स्वरात आत्मा आहे. हा आत्मा अमर आहे. म्हणजेच हा स्वर म्हणजे आत्मा नव्हे. आत्मा हा त्या स्वराच्या पलिकडे आहे. या आत्म्यावर या स्वराने नियंत्रण मिळवता येते. ॐ काराने नियंत्रण मिळवता येते. म्हणजेच या ॐकाराच्या पलिकडे आत्मा आहे. तो मुक्त आहे. पण शरीरात आल्यानंतर तो शरीरात अडकल्यासारखा आपणास वाटतो. आत्मा आहे देह हे वेगळे आहेत. याची अनुभुती आपण सोहम आणि ओमकाराने येते. आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. तो अनुभवायचा आहे. या अनुभवानेच आत्मज्ञानी होता येते. म्हणजेच आपणाला या आत्म्याचे ज्ञान होते. हे ज्ञान नित्य असणे म्हणजेच हा देह आत्मज्ञानी होणे असे आहे. हा आत्मा देहात आल्याने तो आपल्याला देहाचा वाटत आहे. देहातील मोह, माया, अहंकार, मत्सर यांनी त्याची ओळख आपणास होत नाही. पण तो देहापासून वेगळा आहे. देहातून तो मृत्यूसमयी निघून जातो. म्हणजेच नेमके तो कोठे जातो ? या अनंतात तो विलिन होतो. या ब्रह्मांडात त्याचे राहण्याचे ठिकाण कोठे आहे. कोठे तो सामावला आहे. वेदांना सुद्धा याचा ठावठिकाणा लावला आलेला नाही. वेद सुद्धा त्याच्या ठिकाणाचा शोध घेत आहेत. पण तो तर सर्वत्र सामावलेला आहे. प्रत्येक जीवात त्याचे अस्तित्व आहे. या जीवातील आत्मा वेगळा त्या जीवातील आत्मा वेगळा असे काही नाही. सर्व जीवामध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधशी काशी देहातील भगवंत राहीला देहातच उपाशी. यासाठी या देहातील भगवंत, देव जाणावा, तो जाणणे. त्याचा अनुभव घेणे. त्याची अनुभुती येणे हेच तर अध्यात्म आहे. ॐकाराने, सोऽहमने त्याची ओळख करून घेणे गरजेचे आहे. त्याच्यावर नियत्रण मिळवायचे आहे. ते शक्य झाले तर आपण जग जिंकल्यासारखे आहे. कारण या जगात या विश्वात तो सर्वत्र सामावलेला आहे. तो एकच आहे. फक्त आपणास तो वेगवेगळा वाटत आहे. या विजयातच खरे आत्मसुख आहे. आत्मानंद आहे. त्याचे ज्ञान होणे हेच आत्मज्ञान आहे. या ज्ञानाने आपणाला जगाचे ज्ञान होते. जगाची ओळख करुन घेण्यासाठी प्रथम आपण आपली स्वतःची ओळख करुन घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या ओळखीसाठीच साधना करायची आहे. स्वतःच्या ओळखीतच जगाची ओळख आहे. म्हणून स्वतःपासून याची सुरुवात करायची आहे. साधनेने हे शक्य आहे.

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

23 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago