शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अशी करा बीजोत्पादन कांदा पिकातील कापणी आणि मळणी

बीजोत्पादन पिकातील कापणी आणि मळणी

  • कांद्याच्या गोंड्यात एकाच वेळी सर्व बी पक्व होत नाही. बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्याचा रंग तपकिरी होतो व बियांचे आवरण (कॅप्सूल)फाटून त्यात काळपट बी दिसू लागते.
  • गोंड्यात असे ५ ते १० टक्के कॅप्सूल फाटून बी दिसायला लागले तर समजावे बी परिपक्व झालेले आहे. गोंडे जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. सामान्यतः ३ ते ५ वेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते.
  • सकाळच्या वेळी काढणी करावी, जेणेकरून वातावरणातील आद्रता व गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असल्याने बी गळून पडत नाही.
  • गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. गोंडे सुकवताना ते ३ ते ४ वेळा वरखाली करावेत.
  • गोंडे जर चांगले सुकले नाही तर बी मळणी अवघड होते व बियांवर सालपट चिटकून राहिल्याने त्याची भौतिक शुद्धता कमी होते.
  • चांगले सुकलेल्या गोंड्यामधून बी हळू हळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे .
  • हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या साहाय्याने अथवा प्रतवारी यंत्राच्या सहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे.
  • अधिक माहितीसाठी संपर्क –
    डॉ. राजीव काळे, डॉ. एस एस गडगे, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago