पर्यटन

Photos : भुदरगडावरील दुधसागर तलाव…

गडाचे वैभव असणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दूधसागर तलाव.. गडाच्या मध्यावर असणाऱ्या या तलावाजवळ जाण्यासाठी बांधीव रस्ता बांधला आहे. सुमारे २० एकर परिसर या तलावाने व्यापला आहे.

गिता खुळे

कोल्हापूर निसर्ग संपन्न जिल्हा. अनेक पौराणिक मंदिरे आणि गडकिल्ल्यांचा वारसा या जिल्ह्याला लाभला आहे. त्यातील आपल्या नावाने आपल्या तालुक्याची ओळख बनलेला गड म्हणजे भुदरगड होय. या गडाच्या बांधणीचे श्रेय दुसरा राजा भोज यांना जाते. सन १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीच्या ताब्यातून पुन्हा एकदा भुदरगड जिंकून स्वराज्यात आणला आणि त्यावर एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले.

कोल्हापूरपासून गारगोटी ५३ किलोमीटर आणि तिथून १२ किलोमीटरवर भुदरगड वसलेला आहे. याआधी तालुक्याचा संपूर्ण मुलकी व्यवहार भुदरगडावरून पाहिला जात होता. या गडाचे क्षेत्रफळ 167 एकर असून तटबंदीची लांबी अंदाजे साडेचार किलोमीटर इतकी आहे. गडावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, आंबामाता आणि जखुबाई अशी देवस्थाने असून राजसदर, समाध्या आणि अनेक वैशिष्ट्य जपणारी अखंड तटबंदी ही आहे.

पण, याशिवाय गडाला वेगळी ओळख देणारे आणि आणि गडाचे वैभव असणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दूधसागर तलाव.. गडाच्या मध्यावर असणाऱ्या या तलावाजवळ जाण्यासाठी बांधीव रस्ता बांधला आहे. सुमारे २० एकर परिसर या तलावाने व्यापला असून कदाचितच इतका मोठा तलाव कुठल्या गिरीदुर्गावर असावा. दुपारच्या वेळी तलाव पाहताना उन्हामुळे पाण्यात चांदण्या विखुरल्याचा भास होतो. या तलावात असणाऱ्या मातीच्या गुणधर्मामुळे याचे पाणी पांढरे दुधट रंगाचे झाले असून त्यास दुधसागर किंवा पांढऱ्या पाण्याचा तलाव म्हणून ओळखले जाते. सूर्यास्तावेळी हेच अवखळ पाणी शांत होऊन जातं. त्यावेळी तलावा शेजारी बसण्याचा मोह मनाला आवरता येत नाही. पाण्यात हलकेच उठणारे तरंग, इथलं शांत वातावरण, गोठवणारा वारा, पक्ष्यांचे आवाज आणि आभाळात सांडलेले विविध रंग ही खरंतर गडप्रेमी साठी पर्वणीच ठरते.

अन्य छायाचित्रे –

http://instagram.com/durg_kanya

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

3 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

16 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago