कविता

प्रेम चिरंतन…

प्रेम चिरंतन

नजरेत नजर गुंतत आहे 
प्रेम कदाचित सांगत आहे.. 
सांग तुलाही आवडतो ना
प्रेम मला ती मागत आहे... 

उभा घेऊनी गुलाब हाती
मला वाटते गंमत आहे... 
होशील सखे का माझी तू 
मी ही त्याला सहमत आहे 

जवळ येऊन मिठीत घेता
मोर मनाचा थिरकत आहे... 
तव ओठांनी अधर चुंबिता
श्वासात श्वास उतरत आहे... 

रंग उडाला चर्येवरचा 
जगास सारे समजत आहे.. 
तितके तितके जगास कळते
जितके मी ते लपवत आहे... 

स्वप्न गुलाबी पडू लागली
आयुष्याला रंगत आहे... 
युगायुगांची अशी प्रतिक्षा
क्षणात आता संपत आहे...
 
व्यक्त कराया प्रेम भावना 
दिवस आजचा साधत आहे... 
धडधडणारे  हृद्य सांगते
प्रेम चिरंतन श्वाश्वत आहे... 

सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago