काय चाललयं अवतीभवती

उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ ग्रंथाचे प्रकाशन

गार्गी आणि इतर एकांकिका

मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि नामवंत कवी – नाटककार अजय कांडर यांच्या उपस्थित होत आहे. या निमित्ताने या ग्रंथाच्या लेखकाचे मनोगत….

‘गार्गी आणि इतर एकांकिका’, ह्या संग्रहात समाविष्ट झालेल्या ५ एकांकिकाचे विषय हे आजच्या काळात नाविन्यपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि कसदार कलाकार म्हणून ते तितकेच आव्हानात्मकही आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना आणि त्याभोवती गुरफटत जाणारं आयुष्य व परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या, अंतर्मुख होतं राहणाऱ्या ह्या सर्वार्थानं प्रयोगशील एकांकिका आहेत.

‘गार्गी’, ह्या निरागस मुलीचा, शोध घेत असतां; त्यात येणारी पात्र, त्यांचे प्रसंगरूप येणारे विचार, भूमिका आणि त्यामागे येणारी हतबलता ठळक दिसते. नांत्यांची नाळ दूर करण्याची गरज नाट्यमय होताना, सतत मनाची घालमेल होत राहते. तर ‘सचित्तपरियोदपन’ मधील पर्ण, आपल्या अगाध मैत्रीनं, वैश्विक शांतीच्या बांधिलकीने अनेक नक्षलग्रस्त मनाला उभारी, प्रेरणा आणि वैचारिक अधिष्ठान देते. तर ‘चस्का’ मधल्या तरुणाईचं रेल्वेच्या फलाटासारखं मर्यादित असलेलं जग अनेक प्रवासासाठी खुलं आहे. मात्र तरीही परिस्थितीने बेफिकीर असलेल्या ह्या तरुणाईत कायम मैत्रीतली सुंदरता अबाधीत आहे. ‘क्वीनसलँड’ मधील बयो आणि राणी आपल्या दूर देशी, न येणाऱ्या राजपुत्राची डोळ्यांची वात करून आतुरतेने वाट पाहत आहेत. मानवी मनाचा ठाव आणि जगण्याची धडपडत घेऊन ‘मौनांतराचे पाहारेदार’, मधल्या एकांकिकेतला कोकणातला तरुण ऋषी भेटतो;
गावं ते शहर आणि दिवसागणिक विकसित होतं जाणारी माणसं, आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, यंत्र युगात धावताना काही सहज गळून पडणाऱ्या नात्याला आणि मृत्यूच्या परिघाभोवती रिंगण घालणाऱ्या माणसांना, दूर फेकून दिल्याशिवाय ऋषीकेशला पर्याय उरत नाही; आणि मग उरतात बोचऱ्या आठवणी आणि पडक्या घराचा उद्धवस्त होतं जाणारा चौथरा. आपुलकी, प्रेम, नाती आणि आधुनिक काळातीलं नवनवीन आकलनाच्या दिशा शोधण्याऱ्या ह्या सुजाण, नव्या आव्हानात्मक पिढीला; भान देणाऱ्या ह्या एकांकिकेका आहेत.

ह्या संग्रहातल्या एकांकिकाचे अनेक ठिकाणी प्रयोग झालेले आहेत, बक्षिस पात्र आहेत आणि त्याला रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळालेला आहे. आवाहनात्मक रंगकर्मी कलाकार मित्र-मैत्रिणीना, पुस्तकं स्वरूपात ह्या एकांकिका सुपुद करत असतानाच, त्या बंधीस्त न राहता, सतत प्रयोगशील राहतील आणि रसिकांनासह, वाचकांच्या मनाला आनंद देतं ठाव घेतील ही अपेक्षा.!!

उदय जाधव हे मराठी रंगभूमीवरील लक्षवेधी तरुण दिग्दर्शकांपैकी एक महत्त्वाचं नाव असून त्यांचे ‘ देवानंप्रिय असोक’ हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे वेगळे नाटक बहुचर्चित ठरले आहे. सम्राट अशोकाच्या विषयावर, अभिव्यक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता. इतिहासाशी प्रतारणा न करता तो वास्तववादी रंगभूमीवर नाटकं रूपाने मांडणं. हे एक मोठे आव्हान होते हे आव्हान उदय जाधव यांनी यशस्वीरित्या पेलले आहे. तथापि या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोगही या प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आला आहे.

पुस्तकाचे नाव – गार्गी आणि इतर एकांकिका
लेखक : उदय गणपत जाधव
प्रकाशकबुकस्टार पब्लिकेशन
किंमत – २०० रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 hour ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

13 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago