June 1, 2026
Home » ‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६’ साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६’ साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

Poster of Anusaya Raghoji Jadhav Memorial Literary Award 2026 announced in Nanded with prize details and submission deadline

नांदेड : येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६’ (वर्ष तिसरे) साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रातील नवोदित आणि गुणवंत लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या पुरस्कारांतर्गत मुख्य पारितोषिक म्हणून ५,००० रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित चार वाङ्मयप्रकारांतील निवडक साहित्यकृतींना विशेष सन्मान म्हणून प्रत्येकी २,००० रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित पहिल्या आवृत्तीच्या साहित्यकृतींचा विचार केला जाणार आहे. यामध्ये कवितासंग्रह, कादंबरी, कथा/ललित, चरित्र/आत्मचरित्र तसेच वैचारिक/समिक्षा या प्रकारांचा समावेश आहे.

साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख १० मे २०२६ असून, इच्छुक साहित्यिकांनी आपली पुस्तके संयोजक, अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार, द्वारा डॉ. माधव जाधव, ६, कुळवाडी, साईनगरी, तरोडा पो.ऑ. काबरानगर जवळ, वाडी (बु.), नांदेड – ४३१६०५ येथे पाठवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४

Related posts

‘स्वाभिमानी’चे रायगडावरून जनजागृती अभियान

रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा

अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!