Gargoti aksharsagar-state-level-award-decleared
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ) येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने 2020 मधील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून हे साहित्य पुरस्कार मंचाचे अध्यक्ष राजन कोनवडेकर व उपाध्यक्ष डाॅ. अर्जुन कुंभार यांनी आज जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने १४ मार्च रोजी घेण्यात येणाऱ्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.
शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020 पुरस्काराने सन्मानित करणेत येणार अशीही माहिती मंचाच्या वतीने देण्यात आली. जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे –
1) संतोष जगताप (लोणविरे) – वीजेने चोरलेले दिवस (कादंबरी)
2) रुस्तम होनाळे (नांदुरा) – वऱ्हाडातली बिऱ्हाडं (कथासंग्रह)
3) देवा झिंजाड (गारखिंडी, नगर) – सगळं उलथवून टाकलं पाहिजे (कवितासंग्रह)
4) नामदेव चव्हाण (सोलापूर) – लदनी (आत्मकथन)
5) शिरीष देशमुख (मंगरूळ,जालना) – बारीक सारीक गोष्टी (बालकथा)
6) श्रीराम पचिंद्रे – मृगजळ मागे पाणी
7) गुरुबाळ माळी – कोरोना अनलाॅक
8) डाॅ. चंद्रकांत पोतदार – सृजनगंध
9) शौकत नदाफ – आनंदचक्र
10) सुनील देसाई – सप्तपर्व
11) डाॅ. शिवाजी काळे – गावकुसातल्या गोष्टी
12) सुरेश सायत्री किसन धनवे – अस्वस्थ मनाचे बंड
13) प्रदीप देशमुख – गर गर भोवरा
14) सुभाषचंद्र जाधव – शहेनशहा ए मूसीकार नौशाद
15) व्ही.डी.पाटील – रमे तेथे मन
16) डाॅ. सतिशकुमार पाटील – A D H D एक भावविश्व
17) गोपाळ आवटी – सृजन संवाद
18) विजय वडवेराव – इजु
19) अमर मुसळे – अमरवेल
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…