काय चाललयं अवतीभवती

हरवलेला गाव…यंदाच्या प्रतिभा दिवाळी अंकाचा विषय

इस्लामपूर : सध्या वर्चस्ववादी लोक जुने सगळे पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या वेगळ्या प्रकारच्या साहित्याचे मार्केट जोरात असताना ‘प्रतिभा’ मात्र जुनी मुळे धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेते किरण माने यांनी काढले.

प्रतिभा दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आनंद विंगकर अध्यक्षस्थानी होते. प्रतिभा अंकात यंदा ‘हरवलेलं गाव’ हा विषय घेण्यात आला आहे. अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या मनोगतात मायणी गावच्या आठवणींना वाट करून दिली.

प्रत्येकाच्या जगण्यात गावाचा किती महत्वाचा वाटा असतो आणि हे गावपण टिकले पाहिजे यासाठी प्रतिभा सारखे अंक कसे मौल्यवान योगदान देत आहेत.

अभिनेते किरण माने

ते म्हणाले, “शहरीकरणाचे अतिक्रमण थोपवले पाहिजे. नव्या पिढीला जुन्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्याशिवाय त्यांची नात्यांशी भावनिक नाळ जुळणार, टिकणार नाही. काळ झपाट्याने बदलत आहे. खेडेगावातील अनेक गोष्टी लुप्त होतायत. या परिस्थितीत प्रतिभा दिवाळी अंकाने हरवलेलं गाव हा विषय घेणे हे दुर्मिळ आणि आनंददायी आहे. पूर्वीच्या आणि आताच्या लोकांनी नॉस्टॅल्जिक होणे यात खूप फरक आहे. दिवाळी हा बहुजनांचा आनंदोत्सव आहे. प्रतिभा हा त्याचा खऱ्या अर्थाने बळी महोत्सव आहे.”

आनंद विंगकर यांनी ग्रामीण भागातून निघणाऱ्या ‘प्रतिभा’ ने आजवर विविध विषयांची केलेली हाताळणी साहित्य क्षेत्राला पोषक ठरत आल्याचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. संजय थोरात यांनी प्रास्ताविकात दिवाळी अंकांच्या परंपरेचा आढावा घेतला. धर्मवीर पाटील यांनी स्वागत केले. मानसतज्ञ कालीदास पाटील, चित्रकार अन्वरहुसेन, जलसंपदा विभागातील अधिकारी जयंत खाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गौर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उत्तम सावंत, दिग्दर्शक सचिन जाधव, अभिनेता फिरोज शेख, ग्रामीण कथाकार हिम्मत पाटील, सुधीर कदम, आत्मशक्ती पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते. सचिन जाधव यांनी आभार मानले.

Harvlela Gaon Pratibha Dipawali Ank

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

1 hour ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

17 hours ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

1 day ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

2 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

2 days ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 days ago