Heavy rain likely in Vidarbha from Saturday
उन्हाची झळ वाढली पिकांना ताण सहन करावा लागणार
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
काल मंगळवार ( दि. १३ऑगस्टला) ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा हे आठ जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे भाग बदलत सरासरीपेक्षा ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवले. पण ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा या आठ जिल्ह्यात मात्र हेच तापमान २६ ते २८ डिग्री से.ग्रेड दरम्यान होते.
कमाल तापमानाची ही स्थिती कदाचित कमी जास्त प्रमाणात २५ ऑगस्टपर्यंतही राहू शकते. त्यामुळे हवेत दमटपणा जाणवून खरीप पिकांना पाण्याची ओढ बसु शकते. शिवाय वाढत्या दमटपणातून पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमाल तापमान वाढ व भारत महासागर विषुवृत्तीय परिक्षेत्रात, एम.जे.ओ. च्या उपस्थितीत पुढील १० ते १२ दिवस म्हणजे २५ ऑगस्टपर्यन्त विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात शक्यतो दुपारनंतर, मर्यादित क्षेत्रावर, ‘उष्णता संवहनी’ प्रक्रियेतून विजा व गडगडाटीसह तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.
विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र शनिवार (दि १७ ऑगस्ट) पासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…