काय चाललयं अवतीभवती

विदर्भात शनिवारपासून जोरदार पावसाची शक्यता

उन्हाची झळ वाढली पिकांना ताण सहन करावा लागणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

काल मंगळवार ( दि. १३ऑगस्टला) ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा हे आठ जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे  ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे भाग बदलत सरासरीपेक्षा  ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवले. पण ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा या आठ जिल्ह्यात मात्र हेच तापमान २६ ते २८ डिग्री से.ग्रेड दरम्यान होते.

कमाल तापमानाची ही स्थिती कदाचित कमी जास्त प्रमाणात २५ ऑगस्टपर्यंतही राहू शकते. त्यामुळे हवेत दमटपणा जाणवून खरीप पिकांना पाण्याची ओढ बसु शकते. शिवाय वाढत्या दमटपणातून पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमाल तापमान वाढभारत महासागर विषुवृत्तीय परिक्षेत्रात,  एम.जे.ओ. च्या उपस्थितीत पुढील १० ते १२ दिवस म्हणजे २५ ऑगस्टपर्यन्त विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात शक्यतो दुपारनंतर, मर्यादित क्षेत्रावर, ‘उष्णता संवहनी’ प्रक्रियेतून विजा व गडगडाटीसह  तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.

विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र शनिवार (दि १७ ऑगस्ट) पासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

माणिकराव खुळे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती : भारताच्या अर्थकारणाला नवी संधी की नवे संकट ? AI Revolution and Indian Economy

कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ तंत्रज्ञानाचा विषय राहिलेला नाही; ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेलाच नवा आकार देत…

4 hours ago

विश्व व्यापून उरला तोच एक प्रकाश; ज्ञानेश्वरांची विभूतीयोगाची अद्भुत दृष्टी Discovering the Divine Through the Dnyaneshwari

माणसाच्या बुद्धीत उमटणारा विचार, अंतःकरणात जागणारे ज्ञान, ओठांवर येणारे सत्य, क्षमेतून प्रकटणारी करुणा आणि सुख-दुःखाच्या…

17 hours ago

निकृष्ट दर्जामुळे दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून मनाईचा आदेश जारी

मुंबई - ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि…

18 hours ago

वर्ध्याची समृद्ध वाङ्मय परंपरा Wardha rich literary tradition

विदर्भ साहित्य संघ, नागपूर चे तिसरे जिल्हा साहित्य संमेलन वर्धा येथे झाले. यामध्ये डॉ .राजेंद्र…

1 day ago

परदेशी विद्यार्थी भारताकडे वळत आहेत; भारतीय विद्यापीठे ही संधी साधणार का ? India has major opportunity to attract foreign students

‘स्टडी इन इंडिया’चे २०३० पर्यंत दोन लाखांचे लक्ष्य; जागतिक विद्यापीठांच्या शर्यतीत भारताला अजून मोठी झेप…

1 day ago

‘मी’पासून मन, मनापासून सृष्टी; माऊलींनी उलगडले विश्वनिर्मितीचे गूढ!

एकत्वातून विश्वाचा विस्तार; ‘मी’पासून मन आणि मनापासून सृष्टीची निर्मिती सृष्टीच्या आरंभी काय होते? देव, जीव,…

1 day ago