📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 14, 2026
काय चाललयं अवतीभवती

विदर्भात शनिवारपासून जोरदार पावसाची शक्यता

Heavy rain likely in Vidarbha from Saturday

उन्हाची झळ वाढली पिकांना ताण सहन करावा लागणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

काल मंगळवार ( दि. १३ऑगस्टला) ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा हे आठ जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे  ३२ डिग्री से.ग्रेड च्या आसपास म्हणजे भाग बदलत सरासरीपेक्षा  ३ ते ६ डिग्री से.ग्रेड ने अधिक जाणवले. पण ठाणे, पालघर, रायगड, उपनगर, मुंबई, पुणे, नगर, सातारा या आठ जिल्ह्यात मात्र हेच तापमान २६ ते २८ डिग्री से.ग्रेड दरम्यान होते.

कमाल तापमानाची ही स्थिती कदाचित कमी जास्त प्रमाणात २५ ऑगस्टपर्यंतही राहू शकते. त्यामुळे हवेत दमटपणा जाणवून खरीप पिकांना पाण्याची ओढ बसु शकते. शिवाय वाढत्या दमटपणातून पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमाल तापमान वाढभारत महासागर विषुवृत्तीय परिक्षेत्रात,  एम.जे.ओ. च्या उपस्थितीत पुढील १० ते १२ दिवस म्हणजे २५ ऑगस्टपर्यन्त विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात शक्यतो दुपारनंतर, मर्यादित क्षेत्रावर, ‘उष्णता संवहनी’ प्रक्रियेतून विजा व गडगडाटीसह  तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते.

विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र शनिवार (दि १७ ऑगस्ट) पासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

माणिकराव खुळे

Related posts

पोवार समाज, बोली – साहित्य अन् संस्कृती एक आकलन

प्रभानवल्ली ते धूतपापेश्र्वर साहित्य संस्कृती जागर परिक्रमा

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!