काय चाललयं अवतीभवती

पुणे येथील भारतीय विद्या भवन सुरू करणार मराठी माध्यमाची शाळा !

येत्या जून पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील भारतीय विद्या भवन या नामवंत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेने येत्या जून पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे केंद्राचे संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पूर्व प्राथमिक ची मराठी शाळा खेळ गट म्हणजे नर्सरी व बालवाडी छोटा गट म्हणजे ज्युनिअर केजी सुरू केली जात आहे. येत्या जून पासून पूर्व प्राथमिक शाळेचे खेळ गट ( नर्सरी) व बालवाडी (ज्युनिअर केजी) हे वर्ग दुपारच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेऊन प्रारंभी केवळ एक वर्ग सुरू करणार असून त्यामध्ये कमाल तीस पटसंख्या राहील असे ठरवण्यात आले आहे. हे विद्यार्थी दोन वर्षानंतर पहिली इयत्तेमध्ये जातील. त्यावेळी सक्तीच्या मोफत कायद्यातील तरतुदीनुसार (आरटीई ) प्रवेशांसाठी आवश्यक जागांवरील प्रवेश नियमानुसार केले जातील.

भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राची स्थापना १९८३ मध्ये पुण्यात झाली. शिवाजीनगर येथे छाब्रिया नर्सरी स्कूल व सुलोचना नातू विद्या मंदिर या दोन इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. गेली तीन दशके या शाळांचा कारभार सुरू असून मोफत सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसारही 25 टक्के प्रवेश इंग्रजी शाळेमध्ये गेली नऊ वर्षे देण्यात आलेले आहेत. या दोन्ही शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर, मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी भाषा वृद्धिंगत व समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. काकिर्डे यांनी कळवले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

14 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago