Urban Volunteers Join Bhatalavni at Kolkewadi, Ratnagiri: A Unique Farming Experience
रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीत गेले आठवडाभर भात लावणीचा उपक्रम राबविण्यात आला. पॉवर टिलरने नांगरणी करणे, भाताची तयार केलेली रोप काढणे, शेतात माजलेले गवत काढणे, गिरिपुष्पाचा पाला टाकणे आणि रोपांची लावणी करणे अशी कामे चालली. या कामात प्रयोग भूमीतील मोठी मुले, माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग घेतला.
सलग तीन चार तास चिखलात ओणवे राहून काम करणे नवख्यांसाठी अवघड असते. मात्र मुले, शिक्षक त्यासाठी सरावलेले. संध्याकाळी नदीत डुंबल्यावर सारा शिण जातो. या लावणीसाठी प्रयोगभुमीतर्फे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी पुण्याहून सागर चितळे या कामात सामील झाले. त्यानंतर एक दिवस चिपळूणमधील नेत्रविकार तज्ञ व सायकलीस्ट डॉ. मनिषा वाघमारे त्यांच्या स्नेही निलांबरी खोंड, ज्योती परांजपे, मंजुषा काणे यांच्यासह या कामात सहभागी झाल्या. भात लावणी हा श्रमसोहळा असतो. एक आगळावेगळा अनुभव असतो. या सोहळ्यात शहरातील व्यक्तींना शेतीचा आनंद घेण्याची संधी मिळते.
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…