कविता

विकासावर बोलू काही….

मानव जातीला कडेलोटाच्या,
टोकावर घेऊन जाणारा,
कोणता पाशवी विकास,
आपल्याला अभिप्रेत आहे.

आता खरंच आपण साऱ्यांनी,
गंभीर होऊन,
विचार करण्याची अनिवार्य,
गरज निर्माण झाली आहे.

हजारो शेतकऱ्यांच्या,
सृजनशील कृषी कर्माला,
मूठ माती देऊन,
एक दाणा पोटात घेऊन,
हजारो दाने करणाऱ्या,
मातीच्या पाठीवरून,
पेट्रोल, डिझेलच्या,
अजस्त्र वाहनांना,
धावण्याचा परवाना देणारा,
समृद्धी किंवा तत्सम महामार्ग ,
म्हणजे विकास ?

मातीच्या पोटातून,
तिच्या क्षमतेपेक्षा,
जास्त उत्पादन घेऊन,
तिला भाकड बनवणे,
म्हणजे विकास .?
उत्पादन वाढीच्या नावाखाली,
शेतकऱ्यांना बेसुमार कीटकनाशके,
आणि, रासायनिक औषधांचा,
फवारा करायला लावून,
माती आणि माणसाला,
नष्ट करणारी विषारी शेती व्यवस्था,
निर्माण करणे,
म्हणजे विकास ?

जगण्यासाठी जमिनीवर,
अर्धपोटी धडपडणाऱ्या,
लोकांचा विचार करण्याऐवजी,
चंद्र ,सूर्य ,मंगळाचा अभ्यास करण्यासाठी,
अब्जावधी रुपये उधळणे,
म्हणजे विकास ?

हजारो शेतकऱ्यांच्या,
जमिनी पाण्याखाली घालून,
मोठी धरणे बांधणे,.
म्हणजे विकास ?

तारांकित हॉटेल निर्माण करून ,
चायनीज ,कॉन्टिनेन्टल, पिझ्झा, बर्गर,
सारखे, विषारी पदार्थ,
खायची सवय लावणे,
म्हणजे विकास ?

ग्रामीण बाजारपेठ नष्ट करून ,
मार्ट , मॉल निर्माण करून,
वाम मार्गाने,
सामान्य माणसाच्या खिशातून,
पैसा काढणे ,
म्हणजे विकास ?

विकास म्हणजे……,
सत्य, नित्य, शुद्ध, शाश्वत जगण्याची,
प्रत्येक माणसाच्या,
मनामधील उर्मी.

विकास म्हणजे…,
रस्त्यावरून धावणाऱ्या,
वाहनांची संख्या कमी करून,
सार्वजनिक परिवहन व्यवस्था,
निर्माण करणे.

विकास म्हणजे…,
विषमुक्त शेती,
सकस ,सात्विक आहार,
प्रदूषण मुक्त वातावरण.

विकास म्हणजे……,
प्रत्येकाच्या हाताला काम,
आणि ,त्याला योग्य दाम .

तणाव विहिरीत, आरोग्यदायी,
आनंदी जीवन जगण्यासाठी,
भवताल निर्माण करणे,
म्हणजे शाश्वत विकास.

राजा माळगी 9421711367

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

3 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

12 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

13 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago