Liquid Fertilizer from onion peels advice by smita patil
कांदाच्या सालीपासून किंवा कांद्याच्या टाकावू कचऱ्यापासून खत कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊया स्मिता पाटील यांच्याकडून…
आपण रोजच्या जेवणात कांदा वापरतो. पण तो वापरताना त्याच्यावरील साली काढून टाकतो. यासालींचा कचरा खूप असतो. हा कचरा टाकून न देता तो एकत्र करावा. बाजारातून कांदा विकत आणल्यानंतरही त्यातून सालीचा कचरा खूप निघतो. हा सालीचा कचरा पाण्यात भिजत ठेवायचा आहे. एक दिवस पाण्यात भिजल्यानंतर या साली त्या पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत. या पाण्यामध्ये आयर्न, कॅल्शिअम पोट्याशिअम, कॉपर आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या झाडांसाठी खूप आवश्यक असतात. हे पाणी झाडांना हे खत म्हणून उपयुक्त ठरते. एका झाडाला वाटीभर पाणी पुरेसे आहे. तसेच उरलेल्या साली सुद्धा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरता येतात. घरातीलच कचऱ्यापासून आपण घरच्या घरी खत तयार करून झाडांना व वेलांना घातल्यास किंवा फळभाज्यांना घातल्यास येणारे उत्पादन हे सेंद्रिय तर असणारच आहे त्याशिवाय किटकनाशक मुक्त असणार आहे.
मानवतेचा नवा आराखडा "इतिहास म्हणजे केवळ काळाच्या उदरात गडप झालेल्या घटनांचा पडसाद नसून, तो भविष्यासाठी…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
ज्ञानेश्वर माऊलींच्या नवव्या अध्यायातील ही ओवी भक्तीचा अत्यंत गूढ पण सहज आचरणात आणता येणारा मार्ग…
प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी…
गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…
भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…