आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

          १-  गुरुवार दि. २ जुलै पासुन जवळपास आठवडाभर मुंबईसह कोकण, घाटमाथा व नाशिक पुणे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीलगतच्या पश्चिम भागात पावसाने दमदार तर उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मध्यम तर काही ठिकाणी मुसळदार प्रमाणात हजेरी लावली. महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसाचा जोर, शुक्रवार दि. १० जुलै म्हणजे एकादशीपासून पासून मात्र ओसरण्याची शक्यता जाणवते.
              

        २-आता उघडीप कधी व किती दिवसाने मिळेल ?👇

            शुक्रवार दि. १० जुलै ते रविवार दि. १९ जुलैपर्यंतच्या संपूर्ण दहा दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात सुद्धा सध्याच्या पावसाची तीव्रता कमी होवून केवळ हलक्याच पावसाची शक्यता असु शकते.

          ३-उघडीप कश्यामुळे?

              i) पावसाळी हंगामातील महाराष्ट्रातील पावसाला पूरक ठरणारा देशाच्या मध्यावरील दिड किमी. उंचीपर्यंतचा पुर्वो-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक उत्तरेकडे म्हणजे पंजाब हरियाणा यू पी राज्याकडे कडे सरकण्याची शक्यता आहे.

ii)अरबी समुद्र पश्चिम किनारपट्टी समांतर हवेच्या कमी दाबाची दक्षिणोत्तर तटीय द्रोणीय आस (घळ) ही विरळतेतुन उथळ होण्याची शक्यता आहे.

             iii)बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र हे पूर्व भारतात जोरदार पाऊस देत पश्चिम बंगाल व ओरिसातून उत्तर व उत्तर -वायव्येकडे मार्गक्रमण करत येत्या दोन दिवसात दक्षिण राजस्थान मध्ये विरळ होण्याची आहे. त्यामुळे 👇

            अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. 👇 त्यामुळे पुढील १० दिवस पावसाचा जोर कमी होवून महाराष्ट्रात काहीशी उघडीप जाणवणार आहे.

         ४- स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल इतकी उघडीपी असेल काय?

         नाही. 👇 महाराष्ट्राच्या सर्व भागात नाही. परंतु भाग बदलत काही ठिकाणी उघडझाप व ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर काही ठिकाणी भौ. रचनेनुसार स्वच्छ सूर्यप्रकाशही मिळू शकतो.
       उघडीपी दरम्यान दुपार ३ चे दिवसाचे कमाल तापमान त्या आठवड्यात असणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा १-२ डिग्रीने खालवलेले असेल. म्हणजे ते २८ ते ३० डिग्री अंश से. दरम्यानचे असु शकते.

       ५- महाराष्ट्रातील पाऊस, पेर-ओल व पेरणी-

            शुक्रवार दि. १० जुलै नंतर जसजशी जमीन पोतानुसार म्हणजे काळ्या कसदार जमिनीत जेथे १०  ते १२ सेमी. किंवा अधिक आणि हलक्या जमिनीत १५ ते २० सेमी. ओल प्राप्त झाली असेल तर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतःच्या विवेकावर घ्यावा, असे वाटते.

       ६-आता उर्वरित जुलै महिन्यात पुन्हा पावसाला सुरवात कधी होवू शकते ?
        
             त्यापुढील म्हणजे २० ते २४ जुलै दरम्यानच्या जुलै च्या तिसऱ्या आठवड्यातील महाराष्ट्रातील पाऊस वा उघडीपी संबंधीचा खुलासा शुक्रवार दि. १७ जुलै दरम्यान  तयार होण्याऱ्या वातावरणीय प्रणाल्यांच्या निर्मिती शक्यतेच्या आधारावरच अवलंबुन आहे. अर्थात त्यावेळीच त्या संबंधी खुलासा होवू शकेल.       
       
         ७- मान्सून कधी संपूर्ण देश काबीज करणार?

          मान्सून सहसा ८ जुलै ह्या त्याच्या सरासरी तारखेला संपूर्ण देश काबीज करत असतो.  परंतु ह्यावर्षी अजुनही राजस्थानच्या वायव्य भागात मान्सून पोहोचवयाचा आहे. तो सुद्धा येत्या ३ दिवसात म्हणजे १० जुलै दरम्यान संपूर्ण देश काबीज करेल असे वाटते.
         मान्सून ने वेळेत देश काबीज करणे, हे मान्सूनच्या उर्वरित काळातील गतिविधीस पूरक ठरतो.

        ८- भू -जल, धरणे व इतर जलाशये यांच्या पाणी पातळीतील वाढीसंबंधी काय भाष्य करता येईल?

         खरं तर, हीच वेळ पाणी पातळीत वाढ होण्याची असते. महाराष्ट्रात जुलै व ऑगस्ट महिन्यात घाट माथ्यावर कोसळणारा झडीचा मोसमी भीज पाऊसच जमीन भू- जलपातळीत, मोठी व लघु धरणे, साठवण जलाशये व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ करत असतात. अजुन जुलै ऑगस्ट महिने पूर्णपणे जावयाचे आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने धरणे व इतर जलाशयात साठवणीचा श्रीगणेशा केला आहे. ऑक्टोबर अखेर नक्कीच पाणी पातळीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

         ९-पंढरीची वारी व पाऊस

           पुणे परिसरातील नद्यांच्या महापुरामुळे दोन्हीही पालख्यांच्या प्रस्थानादरम्यान व पुण्यात मुक्कामाला येईपर्यंतच्या प्रवासात वारकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागेल. पुण्यातील मुक्कामानंतरचा प्रवासात वारकऱ्यांना पावसाचा विशेष त्रास जाणवणार नाही. त्यापुढील आठवड्याभराचा सुरळीत होवू शकतो, असे वाटते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: १० जुलै पाऊसagriculture weatherArabian Sea WindsBay of Bengalclimate updatecloudy weatherCoastal Raincrop advisoryDam StorageDry SpellFarmers Updatefarming newsGroundwaterIMD PUneIMD WeatherIndia monsoonIye Marathichiye NagariJuly RainfallJuly WeatherKonkan rainlow pressure areaMaharashtra agricultureMaharashtra rainMaharashtra weatherManikrao KhulemeteorologyMonsoon breakMonsoon ConditionsMonsoon Troughmonsoon updatemonsoon windsMumbai rainNashik rainPune weatherrain alertRain Breakrain intensityRain Outlookrainfall forecastrainfall predictionReservoir Levelsrural newsSatara rainseasonal rainfallsouthwest monsoonsowing adviceWeather AnalysisWeather BulletinWeather ExpertWeather Forecast 2026weather newsWestern Maharashtraअरबी समुद्रआयएमडी पुणेइये मराठीचिये नगरीउघडीपकमी दाब क्षेत्रकृषी हवामानकोकण पाऊसखरीप हंगामग्रामीण बातम्याघाटमाथाजलसाठाजुलै हवामानढगाळ वातावरणधरणेनाशिक पाऊसपंढरपूर वारीपर्जन्यमानपश्चिम महाराष्ट्रपाऊस विश्लेषणपावसाचा अंदाजपावसाचा जोर कमीपावसाची उघडीपपावसाची शक्यतापुणे हवामानपेर-ओलपेरणीबंगालचा उपसागरभूजलमहाराष्ट्र न्यूजमहाराष्ट्र पाऊसमहाराष्ट्र शेतीमहाराष्ट्र हवामानमाणिकराव खुळेमान्सूनमान्सून अपडेटमान्सून द्रोणीय आसमान्सून वारेमुंबई पाऊसवातावरणीय बदलवारकरीशेतकरी मार्गदर्शनशेती सल्लासातारा पाऊसहलका पाऊसहवामान अंदाजहवामान अपडेटहवामान तज्ज्ञहवामान बातमीहवामान विश्लेषण

Recent Posts

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

7 hours ago

‘आभाळाच्या गावी’- बालसुलभ मनाचा काव्यात्म आविष्कार करणारी कविता

बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…

8 hours ago

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

18 hours ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

20 hours ago

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

1 day ago