शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राज्यात तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली असून ती पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे, अशी माहिती महसूल व वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांनी दिली आहे.

शासन निर्णयानुसार अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीत डॉ. सावन देशमुख, निलू सोनी, अमोल सावंत, डॉ. वैशाली निकम, लुकेश उर्फ अजय कुकडकर, डॉ. रमझान विराणी, वैष्णवी मसके, आकाश आहाळे, निचकेत उतपट, आदित्य परांजपे, भरत छेडा, जयप्रकाश पठाडे, वैभवी तोडकर, विकास मस्के, देवेंद्र भोसले, रोहन भाटे, संजय सावंत, विशाल पाटील, प्रतीक मोरे, उमाकांत पाटील, संजय वानखेडे, राजेश ठोंबरे आदींचा समावेश आहे.

नियुक्त मानद वन्यजीव रक्षकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या व अधिकार हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 तसेच केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियुक्त्यांमुळे राज्यातील वन्यजीव संरक्षण कार्याला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तीन वर्षांसाठी विविध जिल्ह्यांतील नियुक्त्या अशा…

अमरावती 1) डॉ. सावन माणिकराव देशमुख 2) श्रीमती निलु सोनी
अकोला 1) अमोल जयराम साांवत 2) मिलींद विष्णुपंत शिरभाते
बुलढाणा 1) सचिन रामदास कापूरे 2) डॉ. वैशाली गजेंद्र निकम
गडचिरोली 1) लुकेश ऊर्फ अजय पितांबर कुकडकर 2) मिलिंद मधुकर उमरे
यवतमाळ 1) डॉ. रमझान सद्रुभाई विराणी 2) कु. वैष्णवी सुभाष मस्के
वाशिम 1) आकाश अशोक आहाळे
पुणे 1) नचिकेत यशवंत उतपट 2) गायत्री नचिकेत आवाधनी 3) आदित्य परांजपे
सोलापूर 1) भरत चुनीलाल छेडा
नाशिक 1) जयप्रकाश रंगनाथ पठाडे 2) वैभवी राजेंद्र तोडकर
अहिल्यानगर 1) विकास मच्छिंद्र मस्के 2) सावित्रि अनिल शेवते
कोल्हापूर 1) देवेंद्र भोसले 2) श्रीमती पुजा अमोल हाळवणकर 3) यशपाल सुतार
सातारा 1) रोहन मधुकर भाटे 2) गायत्री नितीन पवार 3) सुनिल भोईटे
सिंधुदुर्ग 1) संजय सावंत 2) भाग्यश्री कृष्णा परब
सांगली 1) विशाल विरसेन पाटील 2) कांचन पुंडलिक सुतार
रत्नागिरी 1) प्रतिक शाांताराम मोरे 2) सोनाली मनोज मेस्त्री
धुळे 1) उमाकाांत अरुण पाटील
नंदुरबार 1) संजय नाना वानखेडे
जळगाव 1) राजेश दत्तात्रय ठोंबरे

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago