Marathi Blog Writing Competition
मुंबई – भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मराठी साहित्य संघातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी साहित्याविषयी ओढ निर्माण व्हावी म्हणून मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा आयोजित केली आहे, तरी विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ . मनोज वराडे व अशोक बेंडखळे यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी मराठी साहित्यात तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्यासमोरील आव्हाने असे दोन विषय निश्चित केले असून या विषयावर कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त ७०० शब्दांत ब्लॉग लेखन करुन २४ डिसेंबर २०२४ पर्यंत sahityasangha@gmail.com या ईमेलवर आपल्या ब्लॉगची लिंक संपूर्ण नाव, महाविद्यालयीन शिक्षण तपशील आणि भ्रमणध्वनीसह पाठवण्यात यावी.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ३००० रुपये रोख, द्वितीय पारितोषिक २००० रुपये रोख व तृतीय पारितोषिक १००० रुपये रोख असे असून जानेवारी २०२५ मध्ये ब्लॉग लेखकांचे संमेलनात विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – मनोज वराडे भ्रमणध्वनी ९८६९३३६३३७
कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…
एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…
पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…
धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…