काय चाललयं अवतीभवती

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन
प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती

कणकवलीः’काहूर ‘ म्हणजे मनातील वादळ. हे वादळ थांबविण्याची ताकद कवितेच्या शब्दात असते. मन मोकळे करून वेदनेला आणि आतल्या आपल्या दुःखाला समजून घेण्याचेही काम कविता करत असते. त्यामुळेच कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकांच्याही मनातील वेदना मोकळी करते. आतल्या अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांनी येथे केले.

येथील कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘रावा प्रकाशन’ ने प्रकाशित केलेल्या ‘काहूर’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार उषा परब, कवी अजय कांडर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर उपस्थित होते.

तर कणकवली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी डॉ. धनश्री तायशेटे सावंत, डॉ. संदीप सावंत, डॉ. एस. एन. तायशेटे, डी. एम. नलावडे, एम. ए. काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना श्री. खोत यांनी काव्यसंग्रहातील कवितांचे नेमकेपणाने मर्म उलगडून दाखवले.

उषा परब म्हणाल्या, कणकवलीत उत्तम कवितेचे वातावरण आहे. या वातावरणातून लिहिणाऱ्या मनीषा पाटील यांच्या कवितांना आम्ही आयोजित केलेल्या काव्य स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत. आता त्यांचा ‘काहूर’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून यातून त्या उत्तम कविता लिहित आहेत हे सिद्ध झाले आहे. पावसाळ्यात मोठा पाऊस येतो आणि ओढ्याला पूर येऊन तो पूर खळाळून ओढ्यातील सर्व काही घेऊन जातो आणि ओढा शांत होतो. तीच भावना ‘काहूर’ काव्यसंग्रहात कवयित्रीच्या कवितांमधून वाचायला मिळते. या कवितांची भाषा समृद्ध आहे. कवितेच्या आशयाशी ती एकजीव झालेली आहे. वाचकांच्या मनातील काहूर या संग्रहातील कविता वाचल्यावर थांबेल, असा मला विश्वास वाटतो.

अजय कांडर म्हणाले, मनीषा पाटील केवळ दुःखात रेंगाळत नाहीत. त्या दुःखाला समजून घेतात, त्याच्याशी संवाद साधतात आणि मग त्याच्या पलीकडे जातात. हाच भाग संपूर्ण कवितासंग्रहाचा गाभा आहे. काहूर आपल्याला संपवायला येत नाही, ते आपल्याला घडवायला येते. प्रत्येक वादळानंतर माणूस आधीपेक्षा जास्त मजबूत होतो, हेच मनीषा पाटील यांनी आपल्या कवितेतून सूचित केले आहे.

मनीषा पाटील म्हणाल्या, काहूर म्हणजे फक्त आठवणी नाहीत, तर सहजीवनातील अनमोल क्षण, सहचराचे गुणविशेष आणि एकटेपणाच्या जाणीवेतून आलेल्या कृतज्ञतेच्या भावना आहेत. एखादी व्यक्ती आपल्यापासून कायमची दुरावली गेली, तर वाचकांना त्या व्यक्तीला यातील कवितांमध्ये शोधता येईल.

यावेळी मधुकर मातोंडकर, डॉ. एस. एन. तायशेटे, डी. एम. नलावडे, एम. ए. काणेकर यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. आभार प्रमिता तांबे यांनी मानले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Ajay Kandarcontemporary literaturecontemporary Marathi poetryemotional poetryinner turmoilIye Marathichiye NagariKahur Marathi bookKahur poetry collectionKankavli Literary EventKankavli literatureKankavli poetKonkan literatureKrishnat KhotKrishnat Khot speechLiterary GatheringMadhukar MatondkarManisha PatilManisha Patil poetryMarathi authorsMarathi book publicationMarathi BooksMarathi creative writingMarathi Cultural EventMarathi KavitaMarathi literary communityMarathi literary cultureMarathi literary eventMarathi Literary NewsMarathi LiteratureMarathi literature eventMarathi literature newsMarathi PoetMarathi poetryMarathi poetry bookMarathi poetry collectionMarathi poetry loversMarathi writerspoetry and emotionspoetry and griefpoetry and memoriespoetry and painpoetry book launchPoetry Collectionpoetry inspirationpoetry launchpoetry publicationSahitya Akademi awardSindhudurg literatureUsha Parabwomen Marathi poetsअंतर्मनातील काहूरइये मराठीचिये नगरीउषा परबएकटेपणाची जाणीवकणकवली कवयित्रीकणकवली साहित्यकणकवली साहित्यिक कार्यक्रमकविता प्रकाशनकवितेची ताकदकवितेतील भावनाकवी अजय कांडरकाव्यप्रकाशन सोहळाकाव्यप्रेमीकाव्यसंग्रह प्रकाशनकाव्यसंग्रह समीक्षाकाहूर कविताकाहूर काव्यसंग्रहकृष्णात खोतकृष्णात खोत भाषणकोकण साहित्यदुःख आणि कवितादुःखातून उभारीभावकवितामधुकर मातोंडकरमनातील वादळमनीषा पाटीलमनीषा पाटील कवितामराठी कवयित्रीमराठी कवितामराठी कवीमराठी काव्यविश्वमराठी काव्यसंग्रहमराठी पुस्तकंमराठी पुस्तक प्रकाशनमराठी लेखनमराठी साहित्यमराठी साहित्य बातम्यामराठी साहित्यविश्वमराठी साहित्यिकवेदना आणि कवितासमकालीन मराठी कवितासंवेदनशील कवितासहजीवनाच्या आठवणीसाहित्य अकादमी पुरस्कारसाहित्य संमेलनसाहित्य संस्कृतीसाहित्यिक कार्यक्रमसाहित्यिक मान्यवरसिंधुदुर्ग साहित्यस्त्री कवयित्री

Recent Posts

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

10 hours ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

1 day ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

1 day ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

2 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

2 days ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 days ago