Poem on Exploitation of Common Man | Manuskichi Antyatra by Pradeep Badde
वास्तवाचा तंतोतंत अनुवाद केला की कवितेला स्वत:चा स्वर लाभतो; साहजिकच कवीही आपली म्हणून खरीखुरी स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशी दणकट अभिव्यक्ती प्रकट करणारी कविता कवी प्रदीप बडदे यांनी आपल्या ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ मधून समोर ठेवली आहे.
प्रा.ऐश्वर्य पाटेकर
(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी)
एकीकडे सत्ताधारी टोळ्यांचा बडेजाव
तर एकीकडे सत्तेबाहेर चाललेली धुसफूस
आम्हाला सत्ताहीन व्हायचं असतं
डोळ्यांच्या त्रिकोणात गाठायचा असतो
आख्यायिकांचा त्रिभुज प्रदेश.,
वस्त्या, वाड्या नेस्तनाबूत होताना
आठवतं गावगाड्याचं लिळाचरित्र ..
किती क्रूरपणे लिहितोय आम्ही हे
आत्मचरित्र!
वरील कवितेच्या ओळी वाचताक्षणी लक्षात आल्यावाचून राहणार नाही की कविता रंजनासाठी नसतेच; कविता खोल समाजवास्तव समजून घेऊन त्याचा सार्थ अन्वयार्थ व्यवस्थेच्या समक्ष मुखरित करत असते. ती व्यवस्थेला तसूभर डरत नाही. वास्तवाचा तंतोतंत अनुवाद केला की कवितेला स्वत:चा स्वर लाभतो; साहजिकच कवीही आपली म्हणून खरीखुरी स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशी दणकट अभिव्यक्ती प्रकट करणारी कविता कवी प्रदीप बडदे यांनी आपल्या ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ मधून समोर ठेवली आहे.
ही कविता सर्वसामान्य पिडल्या-नाडल्या गेलेल्या माणसाच्या काळजाचा हुंकार आहे. ही कविता तिच्या सहज साध्या रूपासह वाचकाच्या मनात ठसायला भाग पाडणारी आहे. आशेचा कुठलाही किरण नसताना आशावादी अंकुर मनात घेऊन जगणाऱ्या माणसाची ही कविता आहे. जागतिकीकरणाने आणि भांडवालशाही व्यवस्थेनं सर्वसामान्य माणसांचं जे शोषण केलं आहे, त्याचं दमन केलं आहे. त्यास नेटक्या शब्दात साकार करणारी ही कविता आहे.
सर्वसामान्य माणसाच्या शोषणावर बोलणारी ही कविता सर्वसामान्यांचं सार्वत्रिक ‘आत्मचरित्र’ आहे. मानवी जीवनव्यवस्थेतील संपलेल्या मूल्यऱ्हासाचं महाभारतच समोर उभं करते. ‘माणूसकीची अंत्ययात्रा’ मांडणारी जरी ही कविता असली तरी अतिशय तळमळीने माणुसकीसाठीच झटणारी आहे. हेच या कवितेचं यश म्हणावं लागेल. ही कविता निश्चितच मराठी काव्यप्रवाहात मोलाची भर घालणारी आहे ..!
काव्यसंग्रह – माणुसकीची अंत्ययात्रा
कवी – प्रदीप दत्ताराम बडदे
प्रकाशक – ललित पब्लिकेशन
पृष्ठे – १०२/ किंमत २००
पुस्तकासाठी संपर्क – ९५९४०२५९९५
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…