Marathwada Floods Poem | Sandeep Jagtap’s Heart-Wrenching Words on Farmers’ Plight
संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन…
सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,
गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली
म्हशी बुडताना, गायी वाहताना, दाव सोडता आले नाही
वावरा मध्ये राबणाऱ्या बैलाला बाहेर काढता आले नाही
जिथे लोक आधी उन्हामुळे होरपळत होते
आणि आता पाण्यामुळे सडत आहेत
सोयाबीन आणि कपाशीचे पीक वाया गेले आहे
नदी गावामधून वाहिली आहे
गल्लीमध्ये आयुष्यात पहिल्यांदा बोट फिरताना पाहिली
म्हैशी आणि गाई पुरात वाहून गेल्या आहेत,
त्यांना वाचवता आले नाही
शेतात राबणाऱ्या बैलांना बाहेर काढता आले नाही
माती खरवडली, वावर खचलं, आयुष्यच टिचलं
आता कसं जगायचं, अख्ख आभाळच कोसळलं
कोणाकडे काय मागायचं, अख्ख आभाळच कोसळलं
मदत म्हणून थोडा आधाराचा श्वास धाडा
कारण काल उन्हामध्ये जळत होता
मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…