काय चाललयं अवतीभवती

संत वाङ्ममय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय अभ्यासावर आधारित साहित्यास पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी दोन सौर वर्षात प्रकाशित संत विषयक मराठी साहित्याचा विचार केला जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रकाशित पुस्तके पाठवावीत असे आवाहन संस्थेचे कार्यवाह य. ल. लिमये व सुहास कुलकर्णी यांनी केले आहे.

दरवर्षी मातृमंदिरच्यावतीने सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेबर) रोजी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. या पुरस्कारासाठी दोन सौर वर्षात प्रकाशित झालेले संत साहित्य पाठवावे. संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन), संतचरित्रे, संतांच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा, कादंबरी, काव्यकोश) आदी सर्व प्रकारच्या साहित्याचा यात समावेश आहे. १०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांच्या लेखकांना अनुक्रमे १० हजार रुपये आणि ८ हजार रुपये असे दोन पुरस्कार ( ६० टक्के रक्कम लेखकास तर ४० टक्के रक्कम प्रकाशकास) दिले जाणार आहेत. त्याशिवाय बालवाङ्मयातील (१०० पृष्ठांच्या आतील) संतकथा, संतचरित्र, संतवचनसंग्रह अशा स्वरुपातील पुस्तकांना प्रत्येक २५०० रुपये असा पुरस्कार देण्यात येणार आहे.

तरी या पुरस्कारसाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑगस्टपर्यंत मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, प्राधिकरण, पुणे ४११०४४ या पत्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी 97651 35769 या क्रमांकावर संपर्क करावा.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

7 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

8 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

21 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago