📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 20, 2026
काय चाललयं अवतीभवती

संत वाङ्ममय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

Matrumandeer Dnyn Prabodhini award for Sant Literature

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय अभ्यासावर आधारित साहित्यास पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी दोन सौर वर्षात प्रकाशित संत विषयक मराठी साहित्याचा विचार केला जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रकाशित पुस्तके पाठवावीत असे आवाहन संस्थेचे कार्यवाह य. ल. लिमये व सुहास कुलकर्णी यांनी केले आहे.

दरवर्षी मातृमंदिरच्यावतीने सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेबर) रोजी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. या पुरस्कारासाठी दोन सौर वर्षात प्रकाशित झालेले संत साहित्य पाठवावे. संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन), संतचरित्रे, संतांच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा, कादंबरी, काव्यकोश) आदी सर्व प्रकारच्या साहित्याचा यात समावेश आहे. १०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांच्या लेखकांना अनुक्रमे १० हजार रुपये आणि ८ हजार रुपये असे दोन पुरस्कार ( ६० टक्के रक्कम लेखकास तर ४० टक्के रक्कम प्रकाशकास) दिले जाणार आहेत. त्याशिवाय बालवाङ्मयातील (१०० पृष्ठांच्या आतील) संतकथा, संतचरित्र, संतवचनसंग्रह अशा स्वरुपातील पुस्तकांना प्रत्येक २५०० रुपये असा पुरस्कार देण्यात येणार आहे.

तरी या पुरस्कारसाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑगस्टपर्यंत मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, प्राधिकरण, पुणे ४११०४४ या पत्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी 97651 35769 या क्रमांकावर संपर्क करावा.

Related posts

वडणगेची कबड्डी परंपराः जय किसान क्रीडा मंडळ

कोल्हापूर-बालींगे-कळे-साळवन-ते गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला

कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीस जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!