मी नि ती

तुझ्यात कुठं उरलोय मी आता
तेच शोधतो मी आता जाता जाता
दिलेली वचने आता विरून गेली
मला पाहून आज ती दुरून गेली
वचनांची तीने राख केली
नि दिलेल्या शब्दांची केली तीने होळी

पण दोघांचा मीपण गळला जर
दोघांनीही एक एक पाऊल पुढे टाकलं तर
जाता जाता एकमेकांत आपण उरणार आहे
संकटातून आपलं प्रेमच तरणार आहे
आपल्यातील दुरावा आज टळणार आहे

अहंकार नि गर्व सारं गळणार आहे
मन तुझं नि माझं जुळणार आहे
प्रेमाची बाग आज छान फुलणार आहे
मत्सर, राग, द्वेष यांना मातीत पुरणार आहे
आपल्यात फक्त प्रेमच उरणार आहे…

कवीचंद्रकांत पाटील, 90298 60193

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

5 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

7 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

16 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago