Shahaji Maharaj Samadhi
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष – विश्वास पाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री आणि राजमाता जिजाऊ यांच्या कुंकवाच्या धन्याची समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत एस्कवर पोस्ट केली आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये विश्वास पाटील म्हणतात, दूर कर्नाटकामध्ये दावणगिरी जिल्ह्यात होदीगीरे या गावात शहाजी महाराज यांची समाधी आहे. महाराष्ट्राचे ते महातीर्थ ऊन्हापावसात करपते आहे. भिजते आहे. 360 वर्षांपूर्वी याच ठिकाणी शिवरायांचे महापिता शहाजीबाबांचे घोड्यावरून पडून अपघाती निधन झाले होते. एखाद्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, तेही शिवरायांसारख्या महापुरुषाच्या जन्मदात्याच्या समाधीकडे महाराष्ट्राने जे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तसे बेच्छूट उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच पाहायला मिळणार नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांच्या वडिलांची कोटी कोटी रुपयांची स्मारके सरकारी खर्चाने या महाराष्ट्रभूमीत बांधली गेली. मात्र आमच्या शहाजीराजांच्या नशिबी हे असे काय यावे.
कोण होते शहाजीराजे ?
तीन वर्षापूर्वी मी हा विषय महाराष्ट्रासमोर मांडला होता. पण प्रश्न आमच्या शिवरायांच्या पित्याचा असतानाही मेलेल्या महाराष्ट्राने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ज्यांनी आधुनिक महाराष्ट्र खऱ्या अर्थी घडवला, त्या जिजाऊ साहेबांना स्वर्गात काय वाटत असेल ? “खूप इज्जत आणि इभ्रत ठेवलीत हो तुम्ही आमच्या कुंकवाच्या धन्याची आणि आमच्या शिवबाच्या परमपूज्य पित्याची”. काळाच्या पाठीवर असामान्य कर्तुत्वाचे ठसे उमटवणाऱ्या या महापुरुषाकडे हा ‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का?
विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक
कर्नाटकातली सामान्य माणसे कशीबशी या समाधीची देखरेख करत आहेत. या संदर्भात दावणगिरी शहाजीराजे ट्रस्टचे अध्यक्ष मल्लेशराव शिंदे यांनीही समाधीवर छप्पर बांधून परिसराचे सुशोभिकरण राजांचा योग्य सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या संदर्भात कर्नाटक सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात ते मल्लेशराव शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा….
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…