विशेष संपादकीय

चाकरमान्यांची घुसमट…

मुंबई कॉलिंग –

गणपती – होळीसाठी हजारो एसटी बसेस सोडल्या जातात. एकाच गावचे लोक संपूर्ण बसचे बुकींग करून जातात. कितीही बसेस व रेल्वे गाड्या सोडल्या तरी पुरेशा पडत नाहीत. कोकणात जाणे व येणे ही मोठी दगदग व कसरत असते. खचाखच भरलेल्या बस व रेल्वेतून आणखी किती वर्षे असाच प्रवास करायचा ?

डॉ. सुकृत खांडेकर

या वर्षी गणेशोत्वाच्या काळात एसटी बसेसमधून सहा लाखापेक्षा जास्त कोकणवासियांनी प्रवास केला व एसटी महामंडळाला जवळपास २४ कोटी रूपये उत्पन्न मिळाले असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीच जाहीर केले आहे. गणपती आणि होळी हे कोकणवासियांचे सण म्हणजे सर्वकाही असते. कोकणातील लक्षावधी लोक नोकरी, धंदा, व्यवसायानिमित्त मुंबईत लहानशा खोलीत दाटीवाटीने कसेतरी राहतात. अनेकांची प्रगती झाल्याने त्यांनी स्वत:च्या मालकीचे फ्लॅटही घेतले आहेत. कोकणवासी कितीही श्रीमंत झाले तरी गणपती व होळीला आपल्या गावाची नि घराची ओढ कायम असते. मुंबईत ऑफीसचे कितीही काम असो, घरी कितीही अडचण असो, बसचे किंवा रेल्वेचे तिकीट मिळो किंवा न मिळो, कोकणातील माणूस गणपती व होळीला आपल्या गावी जाणारच. कोकणाने अनेक नेते दिले. निवडून आलेले आमदार खासदार धनाढ्य झाले. अनेक मंत्रीही झाले पण ते सुध्दा गणपती व होळीला आपल्या गावी जातातच. आपल्या गावची व घराची ओढ कशी असते हे कोकणी माणसाकडून शिकण्यासारखे आहे.

गणपती – होळीसाठी हजारो एसटी बसेस सोडल्या जातात. एकाच गावचे लोक संपूर्ण बसचे बुकींग करून जातात. कितीही बसेस व रेल्वे गाड्या सोडल्या तरी पुरेशा पडत नाहीत. कोकणात जाणे व येणे ही मोठी दगदग व कसरत असते. खचाखच भरलेल्या बस व रेल्वेतून आणखी किती वर्षे असाच प्रवास करायचा ? अहमदाबादवरून मुंबईला बुलेट ट्रेन आणतील, वंदे भारत जिकडे तिकडे सुरू करतील, कोस्टल रोड नि समृध्दीमार्ग वेळेपूर्वी तयार करतील पण मुंबई- गोवा महामार्ग चांगला बनविण्यास गेले पंचवीस वर्षे मुहूर्त सापडत नाही. एसटीकडे आता लाल परी नवीन बसेस चांगल्या आहेत, मग कोकणासाठी जास्तीत जास्त का देत नाहीत ? कोकणातील एसटी स्थानकावरील स्वच्छता गृहे स्वच्छ नि चकाचक कधी होणार? स्थानकावरील उपहारगृहाचा दर्जा कधी सुधारणार ? गणपती, होळी नि तुळशीच्या लग्नाला घरी जाण्यासाठी आरामदायी प्रवास मिळू दे एवढीच चाकरमान्यांची अपेक्षा असते.

गेली काही वर्षे राजकीय पक्षांचे नेते कोकणातील गणेश भक्तांसाठी मोफत विशेष रेल्वे सोडतात. अशावेळी पक्षाचे झेंडे व नेत्यांचे फोटो झळकताना दिसतात. रेल्वे प्रवासात चहा, पाणी, नाष्टा व भोजनही दिले जाते. पण येतानाचा प्रवास तुमचा तुम्ही बघा असे सांगतात. एका बाजुच्या मोफत प्रवासावर कोकणी माणूस खूश असतो. येताना मरणाच्या गर्दीतून घुसमटत येतो.

उत्सवाच्या काळात विशेष रेल्वे गाड्या धावतात. सर्व गाड्या गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. रेल्वेतील स्वच्छतागृहे तर घाणीने भरलेली असतात, वॉश बेसिनला- टॉयलेटमधे पाणी नसते, गाड्या आठ ते दहा तास उशीरा धावतात, गाड्यांमधे पेस्ट कंट्रोल केले जात नसल्याने उंदीर व झुरळे यांचा मुक्त संचार असतो. प्रवाशांचे सामान कुरतडले जाण्याचे अनेक प्रकार घडतात. लक्झरी बसेसचे दर तर आवाच्या सव्वा असतात. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. कोकणातील रिक्षांची भाडीही तशीच आकारली जातात. मुंबई स्टेशनवरून गावच्या रेल्वे स्टेशनपर्यंतच्या भाड्यापेक्षा किती तरी जास्त पैसे रिक्षाने घरी पोचायला मोजावे लागतात. चाकरमान्यांची वर्षानुवर्षे होणारी घुसमट संपणार कधी ?

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

पन्नास वर्षे इतिहासाच्या सत्याचा शोध! गजानन मेहेंदळे यांच्या संशोधनतपस्येचा विलक्षण वारसा

१७ सप्टेंबर २०२६.प्रथम पुण्यस्मरण वर्षदिन.गजानन भास्कर मेहेंदळे: एक ऋषितुल्य इतिहास संशोधक ! https://www.youtube.com/embed/_djMeJxR9pg इतिहास केवळ…

8 hours ago

आकाशालाच माहीत असते त्याचा विस्तार; मग माणसाला स्वतःची ओळख कधी होते?

आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून मोजत राहतो—यश, अपयश, मान, प्रतिष्ठा आणि परिस्थितीच्या तराजूत! पण आपल्या अस्तित्वाची…

8 hours ago

हातात येणारे पैसे आज आनंद देतील; पण उद्या त्याची किंमत कोण मोजणार?

रोख हस्तांतरण योजनांची मोठी राजकीय किंमत ! विशेष आर्थिक लेख देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये सत्तेवर…

23 hours ago

मराठी माणसाच्या अविनाशी उद्योग संस्कृतीचा स्वाभिमान बिंदू Book On PGP Prataprao Govindrao Pawar

उद्योग म्हणजे केवळ नफा, उलाढाल आणि मोठ्या आकड्यांचा खेळ नव्हे; माणसं घडवणारी कार्यसंस्कृती, मूल्यांशी तडजोड…

1 day ago

बहुध्रुवीय जगाची नांदी; भारताच्या नेतृत्वाखाली ब्रिक्सचा नवा अध्याय Brics summit 2026 India Multipolar World

बहुध्रुवीय जगाचा नवा अध्याय जागतिक राजकारणाची दिशा आता केवळ काही मोजक्या महासत्तांच्या निर्णयांवर ठरणार आहे…

1 day ago

गणेशाला जास्वंदाचे फूल का प्रिय ? आयुर्वेद सांगतो त्यामागचे गूढ… Ganesh Festival Special : Hibiscus flower

गणेशोत्सवात श्रीगणेशाला दुर्वांबरोबरच लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्याची परंपरा आहे. गणपतीच्या पूजेत लाल जास्वंदाला विशेष…

1 day ago