Nahee Harayache Poem By Ajay Ramesh Chavan
आलो तसा मज । नाही मरायचे ।
नाही हरायचे । समस्यांना ।।
काय म्हणतील । कोण आपल्यास ।
विसरणे यास । मज आहे ।।
म्हणणारे तर । काहीही म्हणेल ।
आपल्या हसेल । प्रयत्नास ।।
मग काय आता । प्रयत्न सोडावे ।
जीवन जगावे । मृत्यूसम ? ।।
दुर्जन हसेल । त्यांना हसू देणे ।
काय त्रास घेणे । बिनकामी ? ।।
सज्जनांची साथ । हवी आहे फक्त ।
बनेल सशक्त । त्यांच्यामुळे ।।
नराधमांमुळे । क्षय कर्तव्याचा ।
नाही जगण्याचा । यात मार्ग ।।
अशा माणसांची । सावलीही नको ।
कदापिही नको । त्यांची साथ ।।
देशासाठी कर्म । चांगले करणे ।
हसत मरणे । अंतःकाळी ।।
नाही मनामध्ये । विकार पाळणे ।
विचार करणे । निर्मळची ।।
अजुला अज्ञान । दूर सारायचे ।
आहे जिंकायचे । निश्चितच ।।
कवी – अजय रमेश चव्हाण,
तरनोळी, ता. दारव्हा, जि.यवतमाळ
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…