विश्वाचे आर्त

फसवणूक होऊ नये यासाठीच अभ्यासाची गरज

फसवणूक होऊ नये यासाठीच दक्षता, जागरूकता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आपण आमिषांना बळी पडतो. यापासून दूर राहाण्यासाठीच योग्य ती खबरदारी ही घ्यायला हवी. जागरूक राहूनच व्यवहार करायला हवेत. यासाठीच व्यवहार ज्ञान शिकणे गरजेचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

तैसीं इयें कार्याकार्ये । धर्माधर्मरुपें जियें ।
तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ।। ७२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – अरे अर्जुना, परीक्षेची दृष्टि नसतां मोती घेतले तर योग्य सौदा झाला तर तो चुकूनच होणार, पंरतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखे व्हावयाचें.

कोणतीही वस्तू खरेदी करताना, ती योग्य आहे की अयोग्य आहे, हे पारखूनच घ्यावे. मोठ्या कंपनीचे नाव आहे म्हणून आपण वस्तू घ्यायला जातो अन् फसतो असेही प्रकार बऱ्याचदा होतात. वस्तुची पारख ही त्यासाठीच हवी. मोठ्या कंपन्यांच्या नावावरही आता फसवणूक होत आहे. फसवणूक झाल्यावर ग्राहक न्यायालय आहे पण, आम्ही म्हणतो फसायचेच कशाला ? फसवणूकीचे प्रकार काही आजचे नाहीत. हे पूर्वापार चालत आले आहेत. यासाठीच खरेदी करताना खात्री करूनच घेतलेले उत्तम.

कंपन्यांच्या जाहिरातींना भुलून काहीवेळेला आपण वस्तुंची खरेदी करतो. नंतर आपल्या लक्षात येते की, आपण यात फसलो आहोत. यासाठी खरेदीचे व्यवहार करताना जागरूकता ही महत्त्वाची आहे. दक्ष राहून, जागरूक राहून खरेदी करायला हवी. दरवेळी आपण दक्ष असतोच असे नाही, पण फसगत होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्यायलाच हवी.

भौंदूबाबाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. काही ठिकाणी तर त्यांचे भक्तगणच त्यांच्या नावाचा प्रचार करून स्वतःची पोळी भाजून घेतात. काहींनी तर सध्या याचा व्यवसायच सुरू केला आहे. हे दृष्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सेवा-भक्ती अन् व्यवसाय यामध्ये फरक आहे. अध्यात्माचा व्यवसाय होऊ शकत नाही. अनेक मठात भक्तीच्या नावावर फसवणूक केली जात आहे. यासाठी आत्मज्ञानी संतांची खरी ओळख करून घेऊनच अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. आत्मज्ञानी संतांचेच शिष्यत्व पत्करायला हवे म्हणजे फसवणूक होणार नाही.

फसवणूक होऊ नये यासाठीच दक्षता, जागरूकता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आपण आमिषांना बळी पडतो. यापासून दूर राहाण्यासाठीच योग्य ती खबरदारी ही घ्यायला हवी. जागरूक राहूनच व्यवहार करायला हवेत. यासाठीच व्यवहार ज्ञान शिकणे गरजेचे आहे. फसगत केंव्हा होते ? कशी फसगत होते ? हे आजकाल तर समजूनही येत नाही. फसवणूक झाल्यानंतरच आपल्या लक्षात येते. अशावेळी आपण कायद्याची मदतही घेऊ शकतो, पण बऱ्याचदा हे व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसूनच केले गेले असल्याचेही लक्षात येते. यासाठीच व्यवहारात पारख ही महत्त्वाची आहे.

जीवनात दक्षता ही यासाठीच महत्त्वाची आहे. दक्ष राहूनच व्यवहार करायला हवेत. यासाठीच अभ्यास हा महत्त्वाचा आहे. अध्यात्मात फसवणूक टाळायची असेल तर अध्यात्माचाही अभ्यास आपण करायला हवा. बाजारातील वस्तू घेतानाही बाजारपेठेचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे. फसवणूक टाळायची असेल तर संबंधीत घटकाचा अभ्यास करायला हवा म्हणजेच परीक्षेत आपणास यशस्वी होत येईल.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

6 hours ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

20 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

1 day ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

3 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

3 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago