काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

📚🏆📚🏆📝🏆📚🏆📚

कोवाड (ता. चंदगड) : येथील साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांमधून प्रतिष्ठानने ठरवलेल्या निकषांनुसार परीक्षकांनी निवड प्रक्रिया पार पाडली. ललित लेखन आणि चरित्र या दोन विभागांत प्रत्येकी तीन पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख अनंत पांडुरंग कुंभार, संजय पांडुरंग कुंभार, विनायक पांडुरंग कुंभार यांनी दिली आहे.

‘ललित लेखन’ विभागात प्रथम पुरस्कार डॉ. सुनंदा शेळके यांच्या प्रतिभेच्या पारंब्या या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार श्रीराम ग. पचिंद्रे यांच्या सारांश या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार सतीश तिरोडकर यांच्या अनुभवे अंतरी जैसे..या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘चरित्र विभाग’ विभागात प्रथम पुरस्कार केशव बा. वसेकर यांच्या वसा केशवाचा या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार जयवंत जाधव यांच्या वळणं आणि वळण या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार डॉ. मधुकर येवलुजे यांच्या समाज मनाची माणसं.. या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

4 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

8 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

17 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

18 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago