📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 28, 2026
काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

Winners of the Pandurang Kumbhar Foundation Literary Awards 2025 announced in Kowad

📚🏆📚🏆📝🏆📚🏆📚

कोवाड (ता. चंदगड) : येथील साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांमधून प्रतिष्ठानने ठरवलेल्या निकषांनुसार परीक्षकांनी निवड प्रक्रिया पार पाडली. ललित लेखन आणि चरित्र या दोन विभागांत प्रत्येकी तीन पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख अनंत पांडुरंग कुंभार, संजय पांडुरंग कुंभार, विनायक पांडुरंग कुंभार यांनी दिली आहे.

‘ललित लेखन’ विभागात प्रथम पुरस्कार डॉ. सुनंदा शेळके यांच्या प्रतिभेच्या पारंब्या या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार श्रीराम ग. पचिंद्रे यांच्या सारांश या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार सतीश तिरोडकर यांच्या अनुभवे अंतरी जैसे..या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘चरित्र विभाग’ विभागात प्रथम पुरस्कार केशव बा. वसेकर यांच्या वसा केशवाचा या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार जयवंत जाधव यांच्या वळणं आणि वळण या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार डॉ. मधुकर येवलुजे यांच्या समाज मनाची माणसं.. या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Related posts

त्रैमासिक वारुळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

साखर उद्योगाच्या माहितीचा फायदेशीर ग्रंथ : शरद पवार

भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!