Principal Dr Kisanrao Patil appeals for sending entries for the Vadmay Award
जळगाव – मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांचेवतीने प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाड्:मय पुरस्कार देण्यात येतात. राज्यस्तरीय पुरस्कार अकरा हजार रोख, सन्मानपत्र व शाल श्रीफळ तर खानदेश स्तरीय पुरस्कार पाच हजार रोख, सन्मानपत्र व शाल श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सन 2021 पासून हे पुरस्कार दिले जातात. 2021 साली कथा: मनोहर सोनवणे (पुणे), युवराज पवार, 2022 साली कविता: पवन नाट (अमरावती), लतिका चौधरी (नंदूरबार), ऊषा हिंगोणेकर (जळगाव) आणि 2023 साली कादंबरी : ज्ञानेश्वर जाधवर (पुणे), विलास मोरे (एरंडोल) यांना वाड:मय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले. 2024 साली बालसाहित्य वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असनारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव), नीता शेंडे (पाचोरा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
सन 2025 साठी “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्कार ” राज्यस्तरीय व खानदेश स्तरीय हे दोन्ही पुरस्कार समीक्षा या वाड:मय प्रकारासाठी देण्यात येणार आहेत. तेव्हा इच्छुकांनी या दोन्ही वाड:मय पुरस्कारासाठी 1जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 मध्ये प्रकाशित समीक्षा वाड्:मय प्रकारांतील प्रस्ताव समीक्षा ग्रंथाच्या दोन प्रति, लेखकाच्या फोटो, परिचयासह 31, जानेवारी 2025 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन प्राचार्य किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. अशोक कौतिक कोळी ( मो.9421568427 ) यांनी केले आहे.
प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता – प्रा.डॉ. वासुदेव वले, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पाचोरा, तलाठी कॉलनी, पाचोरा जि. जळगाव -424201 मो. 9420788336
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…