📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 29, 2026
काय चाललयं अवतीभवती

मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेमध्ये – घाडी

Deputy Mayor Sanjay Gadi speaking at Dadar Public Library during Venkatesh Madgulkar Award ceremony for Badalte Jag Diwali Ank

मुंबईत बदलते जगला व्यंकटेश माडगुळकर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार

मुंबईमराठी भाषा ही मराठी माणसाची अस्मिता आहे. ती आपल्याला फुकटात मिळालेली नाही. तिच्यात खूप स्थित्यांतरे झालेली आहेत. मराठी भाषेची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत आहे. दिवाळी अंकानी आजवरच्या परंपरेत मराठीतील बोली टिकविण्यात आणि नवे लेखक घडविण्यात मोलाची कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी केले.

ते मुंबईतील दादर सार्वजनिक वाचनालयात आयोजित मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळी विशेषांक पुरस्कार वितरण समारंभामध्ये बोलत होते. यावेळी कोल्हापूरच्या बदलते जग दिवाळी अंकाला ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर सुवर्णमुद्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपादक रावसाहेब पुजारी यांनी तो स्विकारला. यावेळी बदलते जगचे कार्यकारी संपादक अजयकुमारही उपस्थित होते.

श्री. घाडी म्हणाले, मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. ती आपली मराठी माऊली आहे. शतकापासूनची दिवाळी अंक परंपरा यापुढेही जोपासायची असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांनी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत. मराठी भाषा आपल्याला फुकट मिळाली नाही अनेक शतकांपासून बदलत स्थित्यंतर घेत पुढे प्रगल्भ होत आली आहे. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आणि लवचिक भाषा आहे. मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत आहे. ती जपणे प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे.

यावेळी मनमाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अनिल शिनकर यांना दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा सन्मान पुरस्कार देण्यात आला, तर ज्येष्ठ पत्रकार रविकिरण कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर महाराष्ट्रातील ५० हून अधिक दिवाळी अंकांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी उद्योगपती अशोक पाटील, अरूण शेवते, निलिमा कुलकर्णी, रवींद्र मालुसरे आदी यावेळी मनोगते झाली. साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related posts

चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…

माय मावशींच्या हस्ते ‘भुईलेक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

निगडीतील मातृमंदिर संस्थेच्यावतीने पुरस्कारासाठी संत साहित्यावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406